शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 5:00 AM

तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : धान खरेदी करण्याची मागणी, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शासन, प्रशासन शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात नानाविध उपाययोजना केल्याचा दावा करीत असले तरी अद्यापही स्थिती याउलट आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून धान खरेदीला प्रांरभ करण्यात आला. मात्र खरेदी केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगाचरांगा धान खरेदीसाठी लागल्या होत्या. आपला नंबर लागावा म्हणून चपलांचे टोकन ठेवले जात होते. शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी धान खरेदी केंद्रावर असलेल्या अडचणी दुर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र आजही बहूतांश शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून आहे.लाखनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान आधारभुत धान खरेदी केंद्रावर अद्यापही पडून आहे. धान खरेदीपुर्णपणे झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांनी निवेदन देवुन धान खरेदी १८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर धानाचे पैसे जमा करो. तसेच ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस १५ एप्रिलपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबाबत वारंवार जनप्रतिनिधीशी व शासकीय यंत्रणेशी बोलुन सुध्दा शेतकºयांच्या बाबतीत सत्ताधारी विरोधी पक्ष पुर्णपणे बेभरोश्याचे राजकारण करीत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, असे निवेदनात संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले, सुधाकर हटवार, संजय रामटेके यांनी केले आहे.धानाचे चुकारे अदा करण्याची मागणीभंडारा जिल्ह्यात यावर्षी आधारभूत खरेदी केंद्रावर जवळपास २१ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला जिल्ह्यात प्रारंभ झाला. सुरुवातीला ६३ केंद्रावर खरेदी सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत पणन महासंघाच्या ८४ खरेदी केंद्रावर धान घेतला जात आहे. अनेक शेतकºयांचा धान आजही आधारभूत केंद्रावर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीपासूनच धान खरेदीत अनंत अडचणी आल्या. त्यातील पहिली महत्वाची अडचण म्हणजे गोदामाचा अभाव. तांदळाची उचल वेळेवर होत नसल्याने आजही गोदाम हाऊसफुल्ल आहेत. अनेक केंद्रावरील खरेदी महिनाभर बंद होती. बारदान्याची समस्याही कायमस्वरुपी दिसत होती. आता धान विक्रीसाठी अत्यल्प वेळ असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात धान घेऊन केंद्रावर पोहचत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक