शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 3:17 PM

रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे.

ठळक मुद्देपवनारात प्रयोग : शेतात केली मिर्चीची धुणी

भंडारा : रानडुकरांच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले धान पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.

तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. जो सांगेल तसे शेतकरी करतो, परंतु अजूनही यश आले नाही.

यावर तुमसर तालुक्यातील पवनारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला. त्याने सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

वन्य प्राणी रानडुक्कर जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतो. त्याला दूरवरून आलेली पिके कोणत्या शेतात आहे याचा गंध येतो. तेथे जाऊन नासाडी करतो. या दुर्गंधी व खेसखेसीने कदाचित रानडुक्कर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे. हा प्रयोग चार दिवसाच्या अंतराने करावा असेही सांगितले. या प्रयोगाकडे गावतील इतर शेतकरी लक्ष देऊन आहेत, जेणेकरून हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.

अगोदरच शेतकरी धानपिकावर किडीचा प्रादुर्भावामुळे त्रस्त झाला आहे. गाद, खोडकिडा यासह अन्य रोगाने पीक ग्रासले. आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी योग्य आले. त्यातही रानडुकरे नासाडी करतात. वनविभागात नुकसानभरपाई मागितली तर तुटपुंजी मदत मिळताे. त्याकरिताही नानाविध कागदपत्रे व लागणारा अवाढव्य खर्च म्हणून वनविभागाला नुकसान भरपाई मागितली नाही ते बरे, असे बरेच शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी