शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाळी धान उत्पादनात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:38 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे. पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौरास भागातील विहिरींनी गाठला तळ, धान खरेदी केंद्र सुरु नाही, शेतकरी पुन्हा संकटात

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे.पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते. खरीप धान पीक चौरास भागातील मुख्य पीक, तर रब्बी धान पीक म्हणून या भागातील शेतकरी हरभरा, वटाणा, उळीद, मुग, लाख, लाखोरी, गहू, मसूर, पोपट, धना, मोवरी इत्यादी पिके घेत असतात. ही पिके अतिखर्चाची नसल्यामुळे नफ्याची असतात. मात्र पिकांना थंडीची गरज असते. पूर्वीसारखी थंडी पडत नाही. त्यामुळे रब्बी डाळवर्गीय पिके पूर्वीसारखे उत्पादन देत नाहीत. त्यामुळे जे मिळाले ते शेतकरी स्वीकारतात आणि रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर या जागेवर उन्हाळी भात पिकाची लागवड करतात.मात्र यावर्षी उन्हाळी भात शेतीला अखेरची घरघर लागली. चौरास भागात अनेक दिवसांपासून विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाच्या सहाय्याने भात शेती घेतली जाते. मात्र गोसे धरणाच्या बांधकामात धरण बनवित असताना भूमीगत सुरु असलेले पाण्याचे झरे बंद झाले. पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडत गेल्या.गोसे धरणाला ३१ वर्षाचा कालावधी होऊनही या भागातील शेतीला पाणी मिळत नाही. उन्हाळी शेतीचे क्षेत्र वाढले तेव्हा उष्णामिल, राईस मिल, शेतकरी, शेतमजूर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना काम मिळत होते. आता हे सर्वच बंद पडलेले आहे. धानखरेदी केंद्र सुरु नाही व भावही नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या अवघ्या १५ ते २० टक्के विहिरीच्या पाण्यावर धान पिकविण्यात आले. त्याच्या धानाची मोजणी करण्यासाठी शासनाने एकही तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यांचे धान व्यापारी पडक्या भावाने घेत आहेत. त्याची झळ शेतकºयांना पोहचत आहे. ज्यांचे पीक शेतात उभे आहे ते पूर्ण स्वरुपात घरी येईल अशी शेतकºयांना हमी नाही. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात विहिरींनी दम तोडला आहे. सूर्य आग ओकत आहे. विजेचा पुरवठाही आठ तासच मिळत आहे. चौरास भागातील ८० टक्के विद्युत पंप व विहिरी बंद पडल्या आहेत. असे असूनही वीज मंडळाकडून आठच तास वीज पुरवठा होतो. अशीच परिस्थिती राहिली तर उन्हाळी भाताची शेती सुकणार आहे. मड्डा झालेला पिकही शेतकºयाच्या मानगुटीवर बसणार आहे. पावसाळा एक महिना उशिरा गेला तर खरीप भातपिकाच्या नर्सरीसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे गोसे धरणाचे कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे झाले आहे.बोनस जाहीर करण्याची मागणीशासनाकडून धान खरेदीवर बोनस स्वरुपात वाढीव रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु ही बोनस रक्कम उशिरा घोषणा करून दिली जाते. त्यामुळे धान उत्पादक अर्ध्याधिक शेतकºयांना याचा फायदा मिळत नाही. काही शेतकरी व्यापाºयांनाच धान विकतात. गरजेसाठी त्यांना करावेच लागते. पूर्वीच शासनाने हमी भावाबरोबर बोनसची घोषणा केली तर याचा फायदा सर्वच शेतकºयांना मिळू शकतो. त्यामुळे धानाची खरेदी सुरु झाल्याबरोबर शासनाने बोनसची घोषणा करावी किंवा बोनस मिळणार नाही असे तरी सांगावे. त्यामुळे शेतकºयांवर पश्चातापाची वेळ येणार नाही.

टॅग्स :agricultureशेती