शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान उत्पादनात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:38 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे. पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौरास भागातील विहिरींनी गाठला तळ, धान खरेदी केंद्र सुरु नाही, शेतकरी पुन्हा संकटात

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे.पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते. खरीप धान पीक चौरास भागातील मुख्य पीक, तर रब्बी धान पीक म्हणून या भागातील शेतकरी हरभरा, वटाणा, उळीद, मुग, लाख, लाखोरी, गहू, मसूर, पोपट, धना, मोवरी इत्यादी पिके घेत असतात. ही पिके अतिखर्चाची नसल्यामुळे नफ्याची असतात. मात्र पिकांना थंडीची गरज असते. पूर्वीसारखी थंडी पडत नाही. त्यामुळे रब्बी डाळवर्गीय पिके पूर्वीसारखे उत्पादन देत नाहीत. त्यामुळे जे मिळाले ते शेतकरी स्वीकारतात आणि रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर या जागेवर उन्हाळी भात पिकाची लागवड करतात.मात्र यावर्षी उन्हाळी भात शेतीला अखेरची घरघर लागली. चौरास भागात अनेक दिवसांपासून विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाच्या सहाय्याने भात शेती घेतली जाते. मात्र गोसे धरणाच्या बांधकामात धरण बनवित असताना भूमीगत सुरु असलेले पाण्याचे झरे बंद झाले. पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडत गेल्या.गोसे धरणाला ३१ वर्षाचा कालावधी होऊनही या भागातील शेतीला पाणी मिळत नाही. उन्हाळी शेतीचे क्षेत्र वाढले तेव्हा उष्णामिल, राईस मिल, शेतकरी, शेतमजूर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना काम मिळत होते. आता हे सर्वच बंद पडलेले आहे. धानखरेदी केंद्र सुरु नाही व भावही नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या अवघ्या १५ ते २० टक्के विहिरीच्या पाण्यावर धान पिकविण्यात आले. त्याच्या धानाची मोजणी करण्यासाठी शासनाने एकही तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यांचे धान व्यापारी पडक्या भावाने घेत आहेत. त्याची झळ शेतकºयांना पोहचत आहे. ज्यांचे पीक शेतात उभे आहे ते पूर्ण स्वरुपात घरी येईल अशी शेतकºयांना हमी नाही. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात विहिरींनी दम तोडला आहे. सूर्य आग ओकत आहे. विजेचा पुरवठाही आठ तासच मिळत आहे. चौरास भागातील ८० टक्के विद्युत पंप व विहिरी बंद पडल्या आहेत. असे असूनही वीज मंडळाकडून आठच तास वीज पुरवठा होतो. अशीच परिस्थिती राहिली तर उन्हाळी भाताची शेती सुकणार आहे. मड्डा झालेला पिकही शेतकºयाच्या मानगुटीवर बसणार आहे. पावसाळा एक महिना उशिरा गेला तर खरीप भातपिकाच्या नर्सरीसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे गोसे धरणाचे कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे झाले आहे.बोनस जाहीर करण्याची मागणीशासनाकडून धान खरेदीवर बोनस स्वरुपात वाढीव रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु ही बोनस रक्कम उशिरा घोषणा करून दिली जाते. त्यामुळे धान उत्पादक अर्ध्याधिक शेतकºयांना याचा फायदा मिळत नाही. काही शेतकरी व्यापाºयांनाच धान विकतात. गरजेसाठी त्यांना करावेच लागते. पूर्वीच शासनाने हमी भावाबरोबर बोनसची घोषणा केली तर याचा फायदा सर्वच शेतकºयांना मिळू शकतो. त्यामुळे धानाची खरेदी सुरु झाल्याबरोबर शासनाने बोनसची घोषणा करावी किंवा बोनस मिळणार नाही असे तरी सांगावे. त्यामुळे शेतकºयांवर पश्चातापाची वेळ येणार नाही.

टॅग्स :agricultureशेती