दोन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:04+5:30

सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Excessive rainfall in two talukas | दोन तालुक्यात अतिवृष्टी

दोन तालुक्यात अतिवृष्टी

ठळक मुद्दे२४ तासात ५०.१ मिमी पाऊस : १५ दिवसात १७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मान्सून सक्रीय झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असून २४ तासात जिल्ह्यात ५०.१ मिमी पावसाची नोंद झाली. पवनी आणि लाखनी या दोन तालुक्यांसह सात मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून पऱ्हे टाकण्याच्या कामाला वेग आला आहे.
सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यात गत २४ तासात ४७ मिमी, मोहाडी १५.१ मिमी, तुमसर २३.३ मिमी, साकोली ४०.२ मिमी, लाखांदूर २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ८५ मिमी, बेला ७२ मिमी, पवनी तालुक्याच्या आमगावमध्ये ११२.३ मिमी, साकोलीच्या एकोडी मंडळात ७२ मिमी, लाखांदूर तालुक्याच्या बारव्हा मंडळात ६८.८ मिमी,मासळ ७८.४ मिमी, लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १०४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून शेतात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. पºहे टाकणी सुरु झाली असून आणखी दमदार पाऊस झाल्यानंतर आगामी काळात रोवणीला सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रातील पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आणखी दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

पऱ्हे टाकण्याच्या कामाला आला वेग
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर मंगळवारी शेत शिवारात शेतकरी व शेतमजूरांची लगबग दिसत होती. पºहे टाकण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर दिसत होते. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच पऱ्हे टाकले होते. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाला. गत काही वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने शेतकरी यावर्षीही विचारपूर्वक रोवणी करण्याच्या मानसिकतेत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी रोवणी करणार आहे. यावर्षी एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे.

Web Title: Excessive rainfall in two talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस