सायंकाळ होताच भरते मद्यपींची जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:12+5:30
महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे.

सायंकाळ होताच भरते मद्यपींची जत्रा
न्यूज नेटवर्क
भंडारा : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दारुची अवैध विक्री करणाऱ्यांनी शहरात हैदोस घातला आहे. भंडारा शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी सायंकाळ होताच मद्यपींची जत्राच भरत असल्याचे चित्र आहे. अर्थातच यासाठी पोलिसांचे पाठबळ लाभत असल्याची शहरात चर्चा आहे.
शहरातील शास्त्री चौक परिसर, दसरा मैदान, गणेशपूर मार्ग, मिशन शाळा परिसर, मुस्लिम लायब्ररी चौक, महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे. पोलीस मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
रस्त्यावर उभे राहून मद्य प्राशन केले जात असल्याने रस्त्याने जावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी सामाजिक संतुलन बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कानाडोळा केला जात असल्याने संशयाच्या भुवया उंचावल्या जात आहेत.
मोठा बाजार परिसरातही दारु विक्री
शहरातील हृदयस्थळी वसलेल्या मोठा बाजार परिसरातही दारुची विक्री होत असल्याचे खुलेआम चित्र आहे. विशेष म्हणजे मद्यपींना विशेष सुविधाही दिली जाते. दारु पिण्यासाठी लागणाºया चकन्यासह ग्लास, थंड पाण्याची बॉटल याचीही तिथे सुविधा असते. बहुतांशपणे मद्यप्राशन करणारे दारु सोबतच घेऊन येतात. दारु प्यायल्यानंतर शिवीगाळ करणे, जोरजोरात बोलणे असा प्रकारही घडत असतो. मात्र वेळीच परिस्थिती सांभाळून घेत पोलिसांसोबतही सेटींग केली जाते. या परिस्थितीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.