शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

तणसापासून इथेनॉल व सीएनजी प्रकल्प दोन वर्षात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:30 PM

तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपरिणय फुके : मकरधोकडा येथे जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी भंडारा तालुक्यातील मकरधोकडा येथील इथेनॉल व सीएनजी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होेते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे.बी. संगीतराव, कार्यकारी अभियंता डी.एम. नंदनवार, तहसीलदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ उपस्थित होते. भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मकरधोकडा येथील जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करून ती जमीन प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला आहे.धानाचे तणस यापुढे शेतकऱ्यांनी जाळू नये, असे आवाहन करत पालकमंत्री डॉ. फुके म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दोन ते तीन लाख टन तणस या प्रकल्पासाठी लागणार आहे. त्यातून शेतकºयांना हेक्टरी सात ते आठ हजार रूपये मोबदला मिळू शकतो.हा प्रकल्प दीड हजार कोटींचा असून शंभर एकर जमीन लागणार आहे. यासाठी सर्व सहकार्य एमआयडीसी करणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम भारत उपलब्ध करुन देणार आहे. शेल व प्राज टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन इतरही कृषी व वने यातून उत्पन्न होणाºया वेष्टपासून इथेनॉल निर्मिती केल्यास इथेनॉल कमी किंमतीत उपलब्ध होईल असे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.तरुणांना रोजगार मिळणारधानापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचे देशात १२ प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्रकल्प कार्यान्वीत होत आहे. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यात तीन लाख ८४ टन आणि गोंदिया जिल्ह्यात तीन लाख ४६ लाख टन तणस उपलब्ध आहे. इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. तणस बांधणी करणे, मशीनच्या सहायाने होणार असून त्या अनुषंगाने उद्योग उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १५ हजार तरूणांना रोजगार प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.