शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

गुन्हेगारांवर जरब बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:42 IST

पोलिसांनी नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भागात जावून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्री केसरकर : कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : पोलिसांनी नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भागात जावून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. गुन्हेगारांना भिती वाटली पाहिजे, असा जरब निर्माण केला पाहिजे तर नागरिकांना मित्रत्वाची वागणूक द्या. चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस विभाग दोषी ठरेल, अशी कोणतीही कामे करू नका, असा सूचनावजा इशारा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी कायदा व सुव्यवस्था, नक्षलग्रस्त क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी ना.केसरकर हे रविवारला भंडाºयात आले होते. पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य सभागृहात आयोजित बैठकीत पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, गोंदियाचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, गोंदियाचे पालीस अधिक्षक दिलीप भुजबळ उपस्थित होते.पोलीस गृहनिर्माणबाबतचा आढावा घेताना ना.केसरकर म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासासाठी नवीन इमारती बांधण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वेगळा उपशीर्ष तयार करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकाºयांनी याबाबत अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेऊन त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात. त्याप्रकारे नियोजन करून प्रस्ताव सादर करावा. जिथे नवीन पोलीस ठाणे होणार आहे, तिथे राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कुटूंबाची व त्यांच्या पाल्यांची सुविधा लक्षात घेऊन त्यांना पाहिजे तिथे निवासाची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जुना जिल्हा असल्यामुळे येथील पोलिसांच्या जीर्न झालेल्या सदनिकांची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले.भंडारा पोलीस विभागाने अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. पोलिसांची प्रतिमा चांगली उंचावली पाहिजे यासाठी लोकांशी मित्रत्वाची वागणूक दिली पाहिजे. पोलीस विभागाने दारूबंदी व अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील पोलीस निवासस्थान, पदे, पोलिसांची रिक्त पदे, पोलीस ठाणे, फिरते व मोबाईल पोलीस ठाणे, गुन्हे प्रकरणे, अवैध दारुविक्री, रेती तस्करी प्रकरण, बाल व महिला अत्याचार प्रकरण, गोसेखुर्द प्रकल्पाची सुरक्षा, नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था, मिशन संभव, विकास व शांती सप्ताह, शहरातील वाहतूक, सायबर क्राईम, सीसीटिव्ही कॅमेरे, जनावरांची अवैध वाहतूक, पोलीस वाहन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यवस्था आदींचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू व गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप भूजबळ यांनी पोलीस विभागाची माहिती पॉवर प्रेझेंटेशनने सादर केली. संचालन पोलीस उपअधीक्षक एस.व्ही. कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.छोटे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा मानसगोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. पोलिसांनी आदिवासीबहुल भागात जावून नागरिकांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवावे व जनजागृती करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. नक्षलग्रस्त भागात छोटे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा मानस आहे. पोलिसांच्या निवास, आरोग्यावर निधीची कमतरता पडू देणार नाही . जिल्हा वार्षिक योजनेतून या क्षेत्रासाठी भरीव मदत करण्यात येणार आहे. वाहनाविषयी आढावा घेतांना म्हणाले, आधी तांत्रिक बाबी तपासा नंतर प्रस्ताव सादर करा. सॅटेलाईट फोन नक्षलग्रस्त भागात उपयोगी आहे. ज्यामुळे संवाद सोईचे होते. घनदाट जंगलात त्याचा फायदा होतो. नक्षलवाद कसा रोखता येईल यासाठी त्या भागातील आदिवासी समाजात जनजागृती करावी.