शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तलावांना अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: November 9, 2014 22:27 IST

भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे.

तुमसर : भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे. अनेक वर्षापासून या तलावांचे खोलीकरण झाले नसून सर्वच तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती आहे. यात मामा तलाव, जिल्हा परिषद, राज्य जलसंपदा व गाव तलावांचा समावेश आहे. या जिल्ह्यात निलक्रांतीचे स्वप्न भंगण्याची शक्यता बळावली आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे १४ हजार तलावांची नोंद शासनदप्तरी आहे. कागदावर तलावांचे जलक्षेत्र मोठे असून प्रत्यक्षात आराजी जलक्षेत्र कमी आहे. जवळील शेतकऱ्यांनी या तलावावर अतिक्रमण केल्याची माहिती आहे. खीप हंगामात धानपिकाला बहुतेक सर्वच तलावातून पाणी देण्यात आले होते. त्यामुळे सध्या या तलावात केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा सध्या उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात रावणवाडी, चांदपूर, आंबागड, बघेडा, शिवणीबांध, सिरेगावबांध, पवनी तलाव, ढिवरवाडा, कोका जंगल, डोडमाझरी, जांभोरा, पालोरा, सिल्ली, खमारी, एकोडी, बांपेवाडा, बारव्हा, पालांदूर, मुरमाडी (हमेशा) तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, कालपात्री, आमगाव, खळबंधा, पांगळी, इटियाडोह, कटंगी, भानपूर या मोठ्या तलावांचा त्यात समावेश आहे.मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील तलावाचे शासनदप्तरी जलसिंचन क्षेत्र २७ हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्षात हा तलाव केवळ सध्या सात हेक्टरचा राहिला आहे. डोंगरगाव येथील मत्स्यपालन संस्थेनी येथे शासनाकडे तशी तक्रार केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील तलाव शेवटची घटका मोजत असून या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याकरिता खोलीकरणाची मागणी राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे संचालक संजय केवट यांनी केली असून या संपूर्ण तलावांचे क्षेत्राचे शासनदप्तरी नोंद व प्रत्यक्षात जलसिंचन क्षेत्राची चौकीशीची मागणी केली आहे.निलक्रांतीचे स्वप्न भंगणारकेंद्र शासनाने मत्स्यपालन व मत्स्यव्यवसायातून रोजगार निर्मिती करीता हरितक्रांती सारखीच नीलक्रांती ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याला यामुळे अच्छे दिनाची आश होती. परंतु येथील तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असून या तलावात पावसाळ्याखेरीज इतर मोसमात पाणीच राहत नसल्याने मत्स्यपालन कसे होईल हा मुख्य पश्न आहे.मासेमार समाज हा मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला समाज आहे. या नीलक्रांतीमुळे त्यांची प्रगती निश्चित होण्याची हमी आहे. नीलक्रांती येण्याकरिता या दोन्ही जिल्ह्यातील तलावातील तलावांचे खोलीकरण, पाण्याचा योग्य वापर करण्याचे कडक नियम, मत्स्य व्यवसायास प्रोत्साहन व प्रशिक्षण येथे देण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्प अपूर्ण असल्याने व शेतपिकाकरिता तलावातून पाणी सोडणे, पर्जन्यमान कमी होत असलयाने आता येथील शेती तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नीलक्रांती योजना यशस्वीपणे राबविण्याकरिता केंद्र सरकारची चमू भंडारा व गोंदिया जिल्ह्यात लवकरच येणार असल्याची माहिती आहे. ही चमू सद्यस्थितीत तलावांची स्थिती, जलसिंचन क्षेत्र, विस्तार, तलाव किती जुने आहे व उन्हाळ्यात या तलावात किती जलसाठा उपलब्ध राहतो याची चौकशाी करणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)