शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरूद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात ...

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना शेतकऱ्यांचा घेराव : १२ ते १५ तासांचे भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात १२ ते १५ तासाचे सलग भारनियमन होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरूद्ध एल्गार पुकारला आहे. धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना घेराव घातला.जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भाताचे पीक करपत आहे. प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण मदार वीज मोटरपंपावर आहे. अनेक शेतकरी नदी, नाल्यावर आणि विहिरींवर मोटरपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गत १५ दिवसांपासून अचानक भारनियमनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात १२ ते १५ तासाचे भारनियमन केले जाते. त्यातच अनेक रोहित्रांवर दाब वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे ओलीत करणे शक्य होत नाही. त्यातच रात्रीच्यावेळी वीज पुरवठा होत असल्याने ओलीतासाठी मजुरही मिळत नाही. या सर्व प्रकाराने जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.भारनियमनाचा अतिक्ति होत असल्याने भंडारा तालुक्यातील धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. धारगाव विभागात अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. धारगाव फिडरवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. याचा फटका शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. अन्यायकारक भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शेतकरी वीज वितरण कंपनीत धडकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश हुमणे, उपसरपंच शिवाजी रेहपाडे, गुंथाराचे उपसरपंच दिलीप कायते, प्रशांत गजभिये, जनार्धन निंबार्ते, मुरलीधर वंजारी, रामप्रसाद ईळपाते, उमेश सार्वे, राजू सुर्यवंशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.कमी दाबाच्या विजेचा फटकाभारनियमनासोबत शेतकऱ्यांना कमी दाबाचा विजेचा फटका सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातील अनेक रोहित्र ओव्हरलोड झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोडण्या एका रोहित्रावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाब आणि वीज मिळत नाही. कमी दामामुळे मोटारपंप सुरू होत नाही तर अनेक शेतकºयांचे मोटरपंप जळत असल्याच्या तक्रारी आहेत.डिझेल पंपाचा आवाज घुमू लागलाधान पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहे. नदी, नाले आणि तलावावर डिझेल पंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतशिवारात सध्या डिझेलपंपाचा आवाज घुमू लागला आहे.