शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

भारनियमनाविरूद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात ...

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना शेतकऱ्यांचा घेराव : १२ ते १५ तासांचे भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात १२ ते १५ तासाचे सलग भारनियमन होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरूद्ध एल्गार पुकारला आहे. धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना घेराव घातला.जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भाताचे पीक करपत आहे. प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण मदार वीज मोटरपंपावर आहे. अनेक शेतकरी नदी, नाल्यावर आणि विहिरींवर मोटरपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गत १५ दिवसांपासून अचानक भारनियमनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात १२ ते १५ तासाचे भारनियमन केले जाते. त्यातच अनेक रोहित्रांवर दाब वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे ओलीत करणे शक्य होत नाही. त्यातच रात्रीच्यावेळी वीज पुरवठा होत असल्याने ओलीतासाठी मजुरही मिळत नाही. या सर्व प्रकाराने जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.भारनियमनाचा अतिक्ति होत असल्याने भंडारा तालुक्यातील धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. धारगाव विभागात अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. धारगाव फिडरवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. याचा फटका शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. अन्यायकारक भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शेतकरी वीज वितरण कंपनीत धडकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश हुमणे, उपसरपंच शिवाजी रेहपाडे, गुंथाराचे उपसरपंच दिलीप कायते, प्रशांत गजभिये, जनार्धन निंबार्ते, मुरलीधर वंजारी, रामप्रसाद ईळपाते, उमेश सार्वे, राजू सुर्यवंशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.कमी दाबाच्या विजेचा फटकाभारनियमनासोबत शेतकऱ्यांना कमी दाबाचा विजेचा फटका सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातील अनेक रोहित्र ओव्हरलोड झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोडण्या एका रोहित्रावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाब आणि वीज मिळत नाही. कमी दामामुळे मोटारपंप सुरू होत नाही तर अनेक शेतकºयांचे मोटरपंप जळत असल्याच्या तक्रारी आहेत.डिझेल पंपाचा आवाज घुमू लागलाधान पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहे. नदी, नाले आणि तलावावर डिझेल पंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतशिवारात सध्या डिझेलपंपाचा आवाज घुमू लागला आहे.