शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भोवळ आली, पडले अन् गेला जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:24 IST

Bhandara : १० दिवसात ६ जणांचा आकस्मिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अचानकपणे भोवळ आल्याने पडल्यावर काही कालावधीनंतर मृत्यू होण्याच्या ६ घटना मागील १० दिवसात जिल्ह्यात घडल्या आहेत. सध्या नवतपा सुरू असून, तापमान ४५ ते ४६वर पोहचले आहे. हे मृत्यू उष्माघाताचे की, अन्य कशामुळे झाले, याबद्दल आरोग्य विभागाने स्पष्ट केले नसले तरी उष्णतामान वाढल्यानेच या घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे.

या सर्व घटनांमधील पार्श्वभूमी अगदी समान आहे. बहुतेक घटना दुपारच्या सुमारास घडल्या आहेत. भोवळ येणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात आठवड्यापासून तापमान वेगाने वाढले आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून, ते ३७ ते ३८ राहात आहे. कामानिमित्त तसेच शेतावर शेतकऱ्यांना जावेच लागले. कडक उन्हाचा प्रकोप सहन न झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे वाढल्या आहेत.

गुराख्याचा उपचारादरम्यान मृत्यूलाखांदूर: शेत शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेला गुराखी उष्णतेने भोवळ येऊन जमिनीवर पडला. या घटनेची माहिती रात्री उशिरा गुराख्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांना लक्षात आली. त्यानंतर शेतावर पोहचून उपचारासाठी त्याला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भाष्कर तरारे (५२) असे या गुराख्याचे नाव असून, ही घटना ३० मे रोजी मांढळ येथे घडली.

२८ मे रोजी भाष्कर तरारे दुपारच्या सुमारास पाळीव जनावरे घेऊन चराईसाठी गावालगतच्या शेतशिवारात गेला होता. दुपारी जनावरे चरत असताना शेतशिवारात उभा असताना भोवळ आली. त्यामुळे तो जमिनीवर पडला. सोबत कोणीच नसल्याने ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. तो तसाच पडून राहिला. सायंकाळ झाल्यावर जनावरे स्वतःहून गावाकडे परतून घरीही पोहचली. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी शेतशिवारावर शोध घेतला असता शेतशिवारात बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ३० मेच्या दुपारी मृत्यू झाला.

...हे आहेत संभाव्य उष्माघाताचे ६ बळी• पहिल्या घटनेत लाखांदूर येथील इश्वर नारायण लोहारे या ६० वर्षीय शेतकऱ्याचा २० मे रोजीच्या दुपारी शेतामधून घरी परत येताना भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. कापलेले धान जमा करून ते गावाकडे येताना ही घटना घडली.• पवनी तालुक्यातील पिपळगाव येथील शेतकरी चंद्रशेखर बाबूराव जीपकाटे (४७) हे २० मेच्या सकाळी आपल्या घरीच खुर्चीवरून उठताना भोवळ येऊन पडले व त्यानंतर मृत झाले होते. • २६ मेच्या दुपारी जनावरे विकून ब्रह्मपुरीहून मेटॅडोरमधून परत येताना लाखांदूर येथील संतोष विठ्ठल नहाले (४०) यांचा भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. ही घटना प्रवासादरम्यान घडली होती. •  २६ मे रोजी मौदा येथील श्यामराव बकाराम चाचेरे या व्यक्तीचा भंडारा शहरातील बाजारात भोवळ येऊन मृत्यू झाला होता. झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.• २९ मेच्या दुपारी आपल्या घराजवळच्या अंगणाचे मोजमाप करताना सोनी (ता. लाखांदूर) या गावातील गोपाळा डाकू वसाके या ८३ वर्षीय वृद्धाचा भोवळ येऊन मृत्यू झाला होता.• ३० मे रोजी भाष्कर तरारे या ५२ वर्षीय मांडळ (ता. लाखांदूर) येथील गुराख्याचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ मेच्या दुपारी गुरे चारताना तो भोवळ येऊन पडला होता. दोन दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो सहावा बळी ठरला आहे.

"झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे."- डॉ. मिलींद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमान