शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचा जलस्तर वाढविल्याने धान शेतीत शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:48 IST

राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.

ठळक मुद्दे२४३.५०० मीटर जलस्तर : महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर ११ सप्टेंबर रोजी २४३ मीटर नोंदविण्यात आला होता. त्यानंतर जलस्तर वाढविण्यास प्रारंभ झाला. जलस्तर वाढविण्यापूर्वी बुडीत क्षेत्रातील येणाºया नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील गावे खाली करण्यात आली होती. जलस्तर वाढविणे सुरु झाल्यानंतर सोमवारी या प्रकल्पातील जलस्तर २४३.४०० मीटर झाला होता. मंगळवारी हा जलस्तर २४३.५०० मीटरवर जाऊन पोहचला. यावर्षी २४४.५०० मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचा विचार प्रकल्प विभागाचा आहे.गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर वाढविला जात असल्याने अड्याळ जवळील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. २०० हेक्टर शेतीची अधिग्रहण प्रक्रिया नागपूर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने रद्द केली होती. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलस्तर २४२ मीटर स्थिर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा २३ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशाला स्थगिती देत प्रकल्पग्रस्तांना अवार्डचे पैसे देण्याचे निर्देश दिले होते.परिणामी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने या प्रकल्पातील जलस्तर वाढविण्यास प्रारंभ केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जलस्तर २४४.५०० मीटर वाढविण्याचे लक्ष आहे. अड्याळ परिसरातील ६६ प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी यावर आक्षेप घेतला आहे. मुलकलवार म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पात जलस्तर वाढविण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी जलस्तर वाढविणे योग्य नाही. आता अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून त्यातील अनेक शेतकºयांना जमीन अधिग्रहणाचा मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे आम्ही या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.२४३.७०० मीटर पर्यंत वाढणार जलस्तरगोसीखुर्द सिंचन योजनेचे शाखा अभियंता पी.डी. चवरे म्हणाले, प्रकल्पात यावर्षी पाऊस कमी झाल्याने जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलसाठा २४४.५०० मीटर पर्यंत वाढविण्यात आला आहे. यावर्षी हा जलसाठा २४३.७०० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांच्या वतीने भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया रद्द करण्याच्या संदर्भातील अपील विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडे आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने यावर आतापर्यंत कोणताही निर्णय दिला नाही. अंतिम निर्णय येईपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा वाढवू नये.-धनंजय मुलकलवार, अध्यक्ष, महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समिती.