शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचा जलस्तर वाढविल्याने धान शेतीत शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:48 IST

राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.

ठळक मुद्दे२४३.५०० मीटर जलस्तर : महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर ११ सप्टेंबर रोजी २४३ मीटर नोंदविण्यात आला होता. त्यानंतर जलस्तर वाढविण्यास प्रारंभ झाला. जलस्तर वाढविण्यापूर्वी बुडीत क्षेत्रातील येणाºया नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील गावे खाली करण्यात आली होती. जलस्तर वाढविणे सुरु झाल्यानंतर सोमवारी या प्रकल्पातील जलस्तर २४३.४०० मीटर झाला होता. मंगळवारी हा जलस्तर २४३.५०० मीटरवर जाऊन पोहचला. यावर्षी २४४.५०० मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचा विचार प्रकल्प विभागाचा आहे.गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर वाढविला जात असल्याने अड्याळ जवळील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. २०० हेक्टर शेतीची अधिग्रहण प्रक्रिया नागपूर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने रद्द केली होती. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलस्तर २४२ मीटर स्थिर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा २३ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशाला स्थगिती देत प्रकल्पग्रस्तांना अवार्डचे पैसे देण्याचे निर्देश दिले होते.परिणामी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने या प्रकल्पातील जलस्तर वाढविण्यास प्रारंभ केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जलस्तर २४४.५०० मीटर वाढविण्याचे लक्ष आहे. अड्याळ परिसरातील ६६ प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी यावर आक्षेप घेतला आहे. मुलकलवार म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पात जलस्तर वाढविण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी जलस्तर वाढविणे योग्य नाही. आता अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून त्यातील अनेक शेतकºयांना जमीन अधिग्रहणाचा मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे आम्ही या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.२४३.७०० मीटर पर्यंत वाढणार जलस्तरगोसीखुर्द सिंचन योजनेचे शाखा अभियंता पी.डी. चवरे म्हणाले, प्रकल्पात यावर्षी पाऊस कमी झाल्याने जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलसाठा २४४.५०० मीटर पर्यंत वाढविण्यात आला आहे. यावर्षी हा जलसाठा २४३.७०० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांच्या वतीने भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया रद्द करण्याच्या संदर्भातील अपील विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडे आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने यावर आतापर्यंत कोणताही निर्णय दिला नाही. अंतिम निर्णय येईपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा वाढवू नये.-धनंजय मुलकलवार, अध्यक्ष, महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समिती.