शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दर करार बंद झाल्याने लाभार्थ्यांचे ‘अ’कल्याण

By admin | Updated: February 12, 2017 00:19 IST

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

रोख आणायची कुठून? : कल्याणकारी योजनांच्या साहित्यांचे लाभार्थ्यांना वाटप होईनाप्रशांत देसाई भंडाराशासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करावे लागणार आहे. अनेकांची परिस्थिती ‘हातावर आणून पाणावर खाणे’ अशी असल्याने व दरकरार बंद झाल्याने यातील ‘कमिशन’ मिळणार नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये याबाबत आता निरूत्साह दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या साहित्य खरेदीचा फटका लाभार्थ्यांना बसणार आहे.राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारितील शासकीय कार्यालयांतून विविधस कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हा या मागील उद्देश असला तरी, अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. अनेकांची याबाबत नेहमी ओरड राहत असल्याने यावर्षी शासनाने दरकरारावर खरेदी करण्यात येणारी ही योजनाच बंद केली आहे. आता लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार साहित्य खरेदी करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहे. त्या साहित्य खरेदीसाठी लागलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र, यातही आता अनेक अडचणी समोर येत आहेत. शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना योजनांचा पूर्णपणे लाभ मिळेल आणि आनावश्यक गोष्टी टळू शकतील. सद्यस्थितीत डीबीटी अंतर्गत अनेक योजना अंतर्भूत असून या सर्व योजनांमध्ये रोख रकमेच्या स्वरूपात अनुदान देण्यात येते. डीबीटी कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण यांच्यासह मंडळे व महामंडळांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. आता लाभार्थ्यांना स्वत:जवळची अधिकची रक्कम टाकून उच्च दर्जाचे साहित्य खरेदी करण्याची मूभा दिलेली आहे. मात्र, ही खरेदी सर्वप्रथम लाभार्थ्यांना स्वत:च्या रकमेतून करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात रोख जमा करण्यात येईल. कमिशन बंदने सर्व झाले हतबलयावपूर्वी लाभार्थ्यांना या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध कार्यालयातून दरकरार प्रक्रिया राबविली जात होती. यात मोठ्या प्रमाणात कमिशनच्या माध्यमातून अनियमितता होत असल्याची ओरडे होती. दरकरार प्रक्रिया बंद करून थेट अनुदान बँक खात्यावर असा प्रकार झाल्याने कमिशनखोरीत अडकलेल्यांसमोर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे यावर्षी कमिशनखोरी करणाऱ्यांना लाभ मिळत नसल्याने अनेक विभागाच्या लाभार्थ्यांच्या यादींना अंतिमस्वरूप मिळलेले नाही. मागिल वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत यादीला अंतिमरूप मिळाले होते, हे विशेष.मार्चपूर्वी निधी खर्च होणे आवश्यकआर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते. लाभार्भ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासनास्तरावर हालचाली थंडबस्त्यात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी शासकीय तिजोरीत पडून आहे. मार्चपूर्वी हा निधी खर्च होणे गरजेचे आहे. अनेकांचे नाव यादीत असले तरी, त्यांच्याकडे साहित्य खरेदीसाठी पैसे नाहीत. लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य बघितल्यानंतर त्यांना रक्कम मिळणार असल्याने लाभार्थीही काहिप्रमाणात आता निरूत्साही दिसून येत आहे. त्यामुळे मार्चपूर्वी या निधीतून साहित्य खरेदी करणे लाभार्थी व शासकीय यंत्रणेला गरजेचे आहे. अन्यथा कोट्यवधी रूपयांचा प्राप्त झालेला निधी परत जाण्याची भीती आहे.