शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:33 PM

सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा फटका : सात टक्के क्षेत्रात झालेली रोवणीही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.भंडारा जिल्ह्यात खरीपाचे लागवड लायक क्षेत्रफळ दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. सर्वाधिक एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यासोबतच तूर, मुंग, उळीद, तिळ, सोयाबीन आणि ऊसाचे पिकही घेतले जाते. भंडारा हा भात उत्पादक जिल्हा या पिकासाठी पावसाची मोठी आवश्यकता असते. परंतु सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसात शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले. पºहे लावडलायक होत नाही तोच पावसाने पुन्हा दडी मारली. गत तीन आठवड्यापासून तर पावसाचा पत्ता नाही. या कालावधीत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांनी रोवणी केली. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात १३ हजार १० हेक्टरवर रोवणी आटोपली होती. ती धान क्षेत्राच्या केवळ ७.१७ टक्के आहे.शेतात पºहे लागवडलायक झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही. पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. टँकर लावून पºहे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मोठा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. आता पाऊस आला तरी पºहे रोवणीच्या कामी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा शेतकºयांची जमीन पडीत राहण्याची भिती आहे.मूग व उळीद पेरणीला प्रारंभच नाहीजिल्ह्यात उळीद आणि मूगाचे पीक धानपिकासोबत घेतले जाते. परंतु यावर्षी अद्यापही या दोनही पिकाची लागवडच झाली नाही. तिळाच्या ५२४ हेक्टरपैकी ५५ हेक्टरवर लागत झाली आहे.तूर उत्तम, सोयाबीन धोक्यातगत काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर आणि सोयाबीनकडे वळले आहे. जिल्ह्यात यंदा तुरीचे निर्धारित क्षेत्र ११ हजार ७४ हेक्टर आहे. कृषी विभागानुसार २० जुलैपर्यंत सात हजार ५७५ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. तर सोयाबीनचे क्षेत्र आठ हजार ११९ हेक्टर असून आतापर्यंत २२१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्यस्थितीत तुरीची स्थिती उत्तम असली तरी सोयाबीन मात्र धोक्यात दिसत आहे.