शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:09 IST

बाम्हणी-शिवनी शिवारातील शेतकरी हवालदिल

तुमसर (भंडारा) : बावनथडी आंतरराज्य धरणातून उन्हाळी धान व इतर पिकांना पाणी सिंचनाकरिता विसर्ग करण्यात येत आहे; परंतु बाम्हणी- शिवनी शिवारात वितिरिकेतील पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या परिसरातील सुमारे २० ते २२ शेतकऱ्यांचे धानपीक सुकायला सुरुवात झाली आहे. काही शेतात पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाची क्षमता प्रकल्पातून होते, हा दावा येथे फोल ठरत आहे.

बावनथडी प्रकल्पामुळे तुमसर व मोहाडी तालुका सुजलाम् सुफलाम् झाल्याच्या दावा संबंधित विभाग व शासनाकडून केला जातो; परंतु प्रत्यक्षात उन्हाळी धान पिकांना नियमित पाणी दरवर्षी मिळत नाही, तर कुठे एका वर्षाच्या अंतराने पाण्याच्या विसर्ग सिंचनाकरिता केला जातो. ही शेती उंचावर असल्याचा दावा संबंधित विभाग करते; परंतु आधी नियोजन करूनच प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत कसे जाईल, याचा अभ्यास करूनच वितरिकांचे बांधकाम केले जाते. बामणी- शिवनी शिवारात बावनथडी प्रकल्पांतर्गत वितरिकांचे जाळे असूनही परिसरात शेतीला पाणी मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. बाम्हनी- शिवनी शिवारातील २० ते २२ शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक लावले. सुरुवातीला त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले; परंतु आता पाण्याची गरज असताना पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धान पिकाने माना खाली घातल्या असून, शेतात भेगा पडायला सुरुवात झाली आहे. चार ते पाच दिवस या धानाला पाणी मिळाले नाही, तर हे संपूर्ण धान वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाणी विसर्ग सुरू असल्याचा दावा

परिसरातील शेतकऱ्यांनी बावनथडी सिंचन विभागाच्या अभियंत्यांना याबाबत माहिती दिली असता, प्रकल्पातून पाण्याच्या विसर्ग नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वितरित करणारे कर्मचारी वितरिकेची पाहणी नियमित करतात; परंतु त्याकडे ते लक्ष देत नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी चिंताग्रस्त असून, सिंचनाकरिता पाणी मिळाले नाही, तर धानाच्या लागवडीचा खर्च निघणार नसून, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी शेतात पोहोचत नाही. संबंधितांना कळविल्यानंतरही ते लक्ष देत नाही. आता शेतातील पीक वाळायला सुरुवात झाली असून, भेगा पडणे सुरू झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यास जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांची राहील.

- नंदलाल मुटकुरे, शेतकरी, देव्हाडी

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीWaterपाणीbhandara-acभंडारा