शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘डर्टी वॉटर’मुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 24, 2014 22:52 IST

लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली

संजय साठवणे - साकोलीलाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली तरी जिल्हा परिषदेच्या हस्तांतरणाशिवाय जुलै महिन्यापासून ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे साकोली व लाखनी तालुक्यातील नागरिकांना ‘डर्टी वॉटर’ प्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा धोका बळावला आहे.साकोली व लाखनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी राज्य शासनाने २०.५७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. यात जलशुध्दीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दहा वर्षापुर्वी बांधकाम करण्यात आलेल्या व ‘हुडको’च्या अर्थसहाय्याने या जलशुध्दीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात आले. या योजनेअंतर्गत साकोली तालुक्यातील साकोली, जांभळी, शिवनीबांध, खंडाळा, सावरबांध, पिंडकेपार, बोदरा, सेंदुरवाफा तर लाखनी तालुक्यातील पोहरा, लाखोरी, पिंपळगाव, मानेगाव, पेंढरी, गडेगाव, साखरी, सोमलवाडा, गोंडसावरी व रेंगेपार अशा १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या योजनेला दररोज पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर तयार होणाऱ्या निम्न चुलबंद प्रकल्पाचा आसरा घेण्यात आला. मात्र या प्रकल्पालाही पुर्ण होण्यासाठी भरपुर काळ लोटला. मागीलवर्षी या प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे ही जलशुध्दीकरण योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ््यातच पाणीसाठा संपल्याने ही योजना पाण्याअभावी बंद पडली होती. यानंतर पावसाळ््यात पुन्हा पाणी अडविण्यात आले. शुध्द पाणी मिळेल, असे लोकांना वाटले परंतु अपेक्षाभंग झाला. ही योजना पाच महिन्यापासून बंद आहे.