जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:16+5:30
ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे.

जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात
रंजीत चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने जीर्ण घराचे भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरला गावात जीर्ण घराची भींत अपघाताला आमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे. माती आणि कवेलूचे असणारी घरे गावकऱ्यांच्या जीवावर बेतणारी झाली आहे. सिहोरा परिसरातील गावात असे चित्र प्रत्येक गावात असल्याचे दिसून येत आहेत.
दरवर्षी पावसाचे पाण्यामुळे भींती जीर्ण झाली आहेत. या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही. या घरांशेजारी गावातील बालके खेळताना दिसून येत आहे. काही गावात जीर्ण भिंती कोसळल्याने बालकांचा बळी गेला आहे. परंतु गावात जीर्ण घराचे भिंती भुईसपाट करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत या गंभीर समस्येवर विचारमंथन करण्यात आले नाही. गावातील महत्वपूर्ण सभेत सदर विषय चर्चेत घेण्यात येत नाही. यामुळे गावात अशा जिवघेण्या घरांच्या भिंती उभ्या आहेत. घरमालक कधी गावात परतत नाही. घटनेची जबाबदारी स्विकारत नाही. यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी सर्वेक्षणानुसार आधी नोटीस देवून सूचना देण्याची आवश्यकता आहे. जीर्ण घर आणि भिंतीच्या समस्यावर शहरात नगरपालिकामार्फत कारवाई तथा सूचना देण्यात येत आहे. परंतु अशी जागरूकता गावात दिसून येत नाही.
जीर्ण भिंतीवरून ग्रामपंचायत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. राज्यमार्गावरील डोंगरला गावात तुमसर येथील जायस्वाल नामक घर खरेदी केले आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असणाºया या घराची भिंत जीर्ण झाली आहे. याच घराचे शेजारी लहान मुळे खेळत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. भिंतीला भेगा पडल्या असल्याने वर्दळीच्या मार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.
तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात जीर्ण आणि ओसाड भिंती उभ्या आहेत. या भिंती लहान बालकांच्या जीवावर बेतणाºया आहेत. डोंगरलातील घरांची भिंत धोकादायक असल्याने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
-शंकर राऊत, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, तुमसर.