शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांपासून देवरी तलाव कोरडा

By admin | Updated: August 31, 2016 00:24 IST

परिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला.

पुनरूज्जीवनाची गरज : जलयुक्त शिवारातून वगळले, हरितक्रांतीचे स्वप्न कोसोदूरमुखरु बागडे पालांदूरपरिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला. १०० हेक्टरमध्ये तलावाची व्याप्ती आहे. मात्र शासनाच्या दप्तरदिरंगाईने आजही तलाव बादलीभर पाण्याकरिता आसुसलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावाचे पुनरूज्जीवन करण्याची गरज आहे.मागील दहा वर्षांपासून सातत्याने तलाव दुरुस्तीकरिता शासनदरबारी पाठपुरावा करीत असून प्रशासनाच्या सुस्त व वेळकाढू धोरणाने तलावाला न्याय मिळालेला नाही. जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत प्रस्तावित यादी तपासून देवरी तलावाला न्याय दिल्यास परिसरात हरितक्रांती घडण्यास मदत होईल. देवरी (गोंदी) हे गाव जलसिंचन शिवार योजनेत घेतले आहे. याकरिता सुमारे ७० लाखांचा निधी अपेक्षित असून शासनस्तरावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या मदतीने प्रकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.लाखोंचा खर्च केल्यानंतरही नागरिकांना शेतीकरिता पाण्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यात मोठी अफरातफर झाल्याचे वरपांगी दिसून येत असतानाही कोणीही साधा ब्र काढलेला नाही. तलावाचे पुनरूज्जीवन झाल्यास परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमिन ओलीताखाली येईल. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनसुविधा उपलब्ध होईल. २००५ ला अतिवृष्टीने मुख्य गेटवर दबाव पडल्याने किंवा ऊन, वारा, पावसाने परिणाम होऊन मुख्य गेटवर तडे गेले. पाळ फुटली. तलावाचे पाणी शेतात घुसले. शेतकऱ्यांची मच्छीमारांची सुमार नुकसान झाले. या गावातील ढिवर समाजाला मिळणारा हक्काचा रोजगार हातून गेला. सिंचनाची आशा झाली धूसर१९७५ साली रोजगार हमी योजनेतून सुमारे ३० लाख रूपयांचा निधी खर्च करून १०० हेक्टर परिसरात तलावाचे बांधकाम करण्यात आले. तलावाचे म्हणजे नहराचे पाळीचे काम पूर्ण होऊन सिंचन होणार अशी आशा तत्कालीन अभियंत्यांनी शेतकऱ्यांना दाखविली. मात्र आजही आशेची निराशाच दिसत आहे. तलावाच्या दारांच्या चुकीच्या बनावटीमुळे शेतकरी सिंचनापासून मुकला. तलाव निर्मितीला ३५ वर्ष लोटूनही शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.देवरी तलावावर शासनाने लाखोंचा खर्च केलेला आहे. मात्र तलावाचे काम बंद पडले. तलावाचे पुनरूज्जीवन केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना हरितक्रांतीकरिता सहकार्य होईल. यातून त्यांचे जीवनमान उंचावेल. - भरत खंडाईत माजी जिल्हा परिषद सदस्य.