शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात घडला सर्वाधिक प्रकार : सज्ञान होण्याची बाब अधिक गरजेची

इंद्रपाल कटकवारलोकमत न्युज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हे एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतू ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत  करावी लागत आहे. कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.  लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

काय आहेत अफवा

लसीकरणानंतर मृत्यू होतो ग्रामीण भागात कुठे कुठे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी लसीकरणासाठी केंद्रांवर गेलेच नाही. हळूहळू जनजागृतीनंतर तरूणांनीच पुढकार घेतला. अफवांवर पटकन विश्वास ठेवणारे लाेकांना ही चूक लक्षात येतय ही महत्वाची बाब ठरली.

निपुत्रिक होण्याची शक्यतालसीकरणानंतर निपुत्रिक होण्याची दाट शक्यता असते याची अफवाच ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक स्त्रियाही लसीकरणासाठी गेल्या नाहीत. अशी बाब नंतर उघडकीला आली. मात्र हळूहळू प्रशासनाने ही सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणाला वैद्यकीय आधार आहे, हे महत्वाचे आहे.

लसीकरणानंतर घरघर वाटतेकुठलीही लस घेतली तरी मानवी शरीराचे तापमान वाढत असते. ही एक सहज व सोपी प्रक्रीया आहे. असाच प्रकार कोरोना लसीकरणानंतरही झाला. लसीकरणानंतर घरघर वाटणे, ताप येतो ही साधारण बाब तिखट मिर्च लावून   अफवेच्या रुपात सांगण्यात आली. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाला नकार दिला.

गावकरी संभ्रमात

 सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे ठरवले होते. मात्र अफवांमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही संभ्रमात सापडलो होतो. परंतू लसीकरणानंतर कुठलीही गंभीर बाब उजेडात आली नाही तसेच शरीरावरही कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. - एक ग्रामस्थ, अड्याळ

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी त्याची अफवा पहिले असते त्यामुळे लोकांच्या लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणबाबतही झाले आहे. आम्हाला पूर्वी भीती वाटायची, मात्र आता ही भीती दूर झाली आहे. - एक ग्रामस्थ, पालगाव

 अधिकारी म्हणतात,

 जिल्ह्यात लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार सुरू आहे. सुरूवातीच्या काळात ग्रामीण क्षेत्रात काही ना काही अफवा ऐकायला मिळाल्यात. त्याबाबत आम्ही सातत्याने जनजागृतीवर भर दिला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळेतच प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने लसीकरण करून घ्यावे.- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या