शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कोट्यवधींचा खर्च गेला व्यर्थ, भंडारा शहरातील सिग्नल यंत्रणा चार वर्षांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:59 IST

Bhandara : प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष, देखभाल-दुरूस्तीअभावी वाढल्या शहरवासीयांच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल प्रणाली गेल्या चार वर्षापासून बंद पडलेली असून, ती केवळ नावालाच उरली आहे. सिग्नल खांब एकामागून एक कोसळत असून, प्रमुख चौकांवरील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे राजीव गांधी चौक व अन्य चौकात अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असते.

मुस्लीम लायब्ररी चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक व पोस्ट ऑफिस चौक येथे सिग्नल यंत्रणा निष्क्रिय झाल्याने वाहतूक नियमन करणे प्रशासनासाठी कठीण ठरत आहे. नगर परिषदेकडून बसविण्यात आलेले खांब आता गंजून पडत आहेत. सहयोग हॉस्पिटलजवळील सिग्नल खांब अज्ञात वाहनाच्या धडकेत कोसळल्याची माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष पाहणीअंती पाया गंजल्यामुळे तो आपोआप कोसळल्याचे स्पष्ट झाले.

देखभाल-दुरूस्ती थांबल्याने प्रणाली ठप्प

शहरातील सिग्नल प्रणालीची कोणत्याही टप्प्यावर वेळोवेळी देखभाल करण्यात न आल्याने खांबांचे बेस खचले आहेत आणि वायरिंग तुटली आहे. परिणामी, या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. वाहतूक शिस्त, नियमन आणि अपघाती घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे.

वाहतूक विस्कळीत, नागरिक त्रस्त

सिग्नल बंद झाल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणचे बंद पथदिवे, झुकलेले खांब आणि तुटलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे धोका वाढला आहे. नागरिकांना असुविधा सहन करावी लागत असून, विद्यार्थ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच वर्गातील भंडारेकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केल्या जात आहे.

प्रशासनाची निष्क्रियता ठरली कारणीभूत

सिग्नल यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र त्याची देखभाल पूर्णतः थांबली आहे. सिग्नल खांब कोसळल्यानंतर देखील संबंधितांना कळविण्यात आले नाही आणि त्यांनी दुरुस्तीच्या हालचालीही केल्या नाहीत.

स्वतंत्र स्थायी यंत्रणा उभारण्याची गरज

या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासनाकडून सतत होणारे दुर्लक्ष पाहता नागरिकांनी सिग्नल व्यवस्थेच्या मजबूत देखभालीसाठी स्वतंत्र स्थायी यंत्रणा स्थापनेची मागणी केली आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून शहरातील वाहतूक यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

"नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा सिग्नल यंत्रणेवर झालेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरेल, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे."- डॉ. बाळकृष्ण सार्वे, नागरिक, भंडारा.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhandara's traffic signal system defunct for four years, crores wasted.

Web Summary : Bhandara's traffic signals, costing crores, have been non-functional for four years, causing traffic chaos. Negligence and lack of maintenance have led to their collapse. Citizens demand immediate action and a dedicated maintenance system to restore order.
टॅग्स :Vidarbhaविदर्भTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस