शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महागाई व जलसंकटाने घरकुल लाभार्थ्यांवर ओढावले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:10 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्देसिमेंट, वाळूचे दर गगणाला : रोजगार मिळेना, संसार चालवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.सिमेंटच्या अमर्याद दरवाढीमुळे विकास कामांसह वैयक्तीक घरे उभारणाऱ्या सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहेत. परिणामी भंडारा शहरासह जिल्ह्यातील बांधकाम उद्योग ठप्प होण्याचे संकट ओढवले आहे. वाढत्या सिमेंट दराला नियंत्रणात ठेवण्यात शासनही अपयशी ठरले आहे. बांधकामासाठी सिमेंट, लोखंड , वाळू , पाणी आदी अत्यावश्यक असून याचे दर नेहमीच अस्थिर राहतात. याचाच फायदा जिल्ह्यातील वाळूतस्करीला प्रोत्साहन मिळत आहे. मागील वर्षभरापासून वाळू मिळणे दुर्मिळ झाले असून वाळूच्या दरात देखील सातत्याने वाढ होते आहे. घर बांधकामासाठी मिळेल त्या दरात वाळूची खरेदी करणे ग्राहकांची समस्या बनली आहे. देशातील सिमेंट उत्पादकांच्या अमर्याद दरवाढीचा बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे.मार्च अखेर सिमेंटदरात वाढ होवून सिमेंटच्या एका बॅगची किंमत ५० किलोला ३५० ते ४०० रूपयांवर पोहचली आहे. स्टिलच्या किंमतीही ४१ ते ४४ रूपये प्रति किलो वर पोहचल्या आहेत. त्यातच वाळू मिळणे दुरापास्त झाल्याने घरबांधकाम करणे ही सर्व सामान्यांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे वाढत्या बांधकाम साहित्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात सिमेंटचा तुटवडाएखादे बांधकाम करताना बांधकाम कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यातच बांधकाम साहित्यासाठी ५० टक्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाते. बांधकाम साहित्य एजन्सीधारकही साहित्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतात. पण पैसे देऊनही बांधकाम साहित्यासाठी टोलवाटोलवी करतात. आॅडरप्रमाणे पैसे देऊनही बांधकामाच्या पुढील टप्प्यासाठी दर वाढणार असल्याने ग्राहकांना एजन्सीधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण बांधकामासाठीच लागणाºया साहित्याची बुकिंग करण्यासाठी आगावू रक्कम घेतले जाते. परंतु दोन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही वेळेत सिमेंट तसेच बांधकाम साहित्य मिळत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी संकटात आहे.पाणीटंचाईचा जाणवतोय परिणामयावर्षी कमी झालेल्या पर्जन्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने बांधकामास टाळाटाळ होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील रोजगारावर होत आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे अनेक घरकुलांसह, अनेकांची बांधकामे रेंगाळली आहेत. .