शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महागाई व जलसंकटाने घरकुल लाभार्थ्यांवर ओढावले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:10 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्देसिमेंट, वाळूचे दर गगणाला : रोजगार मिळेना, संसार चालवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.सिमेंटच्या अमर्याद दरवाढीमुळे विकास कामांसह वैयक्तीक घरे उभारणाऱ्या सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहेत. परिणामी भंडारा शहरासह जिल्ह्यातील बांधकाम उद्योग ठप्प होण्याचे संकट ओढवले आहे. वाढत्या सिमेंट दराला नियंत्रणात ठेवण्यात शासनही अपयशी ठरले आहे. बांधकामासाठी सिमेंट, लोखंड , वाळू , पाणी आदी अत्यावश्यक असून याचे दर नेहमीच अस्थिर राहतात. याचाच फायदा जिल्ह्यातील वाळूतस्करीला प्रोत्साहन मिळत आहे. मागील वर्षभरापासून वाळू मिळणे दुर्मिळ झाले असून वाळूच्या दरात देखील सातत्याने वाढ होते आहे. घर बांधकामासाठी मिळेल त्या दरात वाळूची खरेदी करणे ग्राहकांची समस्या बनली आहे. देशातील सिमेंट उत्पादकांच्या अमर्याद दरवाढीचा बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे.मार्च अखेर सिमेंटदरात वाढ होवून सिमेंटच्या एका बॅगची किंमत ५० किलोला ३५० ते ४०० रूपयांवर पोहचली आहे. स्टिलच्या किंमतीही ४१ ते ४४ रूपये प्रति किलो वर पोहचल्या आहेत. त्यातच वाळू मिळणे दुरापास्त झाल्याने घरबांधकाम करणे ही सर्व सामान्यांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे वाढत्या बांधकाम साहित्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात सिमेंटचा तुटवडाएखादे बांधकाम करताना बांधकाम कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यातच बांधकाम साहित्यासाठी ५० टक्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाते. बांधकाम साहित्य एजन्सीधारकही साहित्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतात. पण पैसे देऊनही बांधकाम साहित्यासाठी टोलवाटोलवी करतात. आॅडरप्रमाणे पैसे देऊनही बांधकामाच्या पुढील टप्प्यासाठी दर वाढणार असल्याने ग्राहकांना एजन्सीधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण बांधकामासाठीच लागणाºया साहित्याची बुकिंग करण्यासाठी आगावू रक्कम घेतले जाते. परंतु दोन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही वेळेत सिमेंट तसेच बांधकाम साहित्य मिळत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी संकटात आहे.पाणीटंचाईचा जाणवतोय परिणामयावर्षी कमी झालेल्या पर्जन्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने बांधकामास टाळाटाळ होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील रोजगारावर होत आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे अनेक घरकुलांसह, अनेकांची बांधकामे रेंगाळली आहेत. .