शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वंकष आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:30 IST

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

सरासरी उत्पन्नात वाढ अपेक्षित : गट शेतीला महत्त्व, कृषि विकासाला प्राधान्यभंडारा : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वंकष व सर्वसमावेशक उत्पन्नवाढीचा आराखडा तात्काळ तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केल्या. जिल्ह्याचे सद्याचे सरासरी उत्पन्न, मागील तीन वर्षातील उत्पन्न, सर्वात जास्त उत्पन्न घेणारा तालुका, गाव व पीक पद्धती या बाबीचा अभ्यास करुन खरीप हंगाम २०१७-१८ साठी उत्पन्न वाढीचा उपाय व करावयाची कृती या आराखड्यात असणे अपेक्षित आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनवाने, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. शासनाने खरीप हंगाम २०१७-१८ या वर्षात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण, प्रसार प्रसिध्दी, शेतकरी प्रशिक्षण, नाविन्यर्पूण बाबी, मृद आरोग्य व सेंद्रिय शेती, कांदा चाळ, नियंत्रित शेती आणि सुक्ष्म सिंचन या बाबीचा या मोहिमेत समावेश आहे.या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शेती उत्पन्न वाढीसंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या. भंडारा जिल्ह्यात मुख्य पीक धान असून दुसऱ्या स्थानी बांधावरील तूर आहे. या व्यतिरिक्त अनेक शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. या बाबी लक्षात घेता खरीपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकरी जे वाण वापरतात. त्याची उत्पादन क्षमता काय, कुठल्या भागात या वाणाचे जास्त उत्पादन होते. यावर संशोधन करण्यात यावे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून गट शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा प्रयोग यशस्वी करता येतो का? या बाबत कृषि विभागाने आढावा घ्यावा, गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना जिल्हाधिकारी यांनी मांडली आहे.पारंपारिक पध्दती व्यतिरिक्त शेतात अभिनव प्रयोग करुन उत्पन्न वाढविणाऱ्या गटांना रोख स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखविला. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून कृषि विभागाने प्रशिक्षण मोहिम हाती घ्यावी.या वर्षीच्या खरीप हंगामातील कृषि विभागाचा मुख्य उद्देश उत्पन्न वाढविणे हा असावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, यासाठी सरसकट प्रयत्न न करता काही मोजकी व ठराविक शेती गट यासाठी निवडण्यात यावे. याच क्षेत्रात लक्ष केंद्रीत करुन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांना लागणारे सर्व ते सहकार्य कृषि विभागाने करावे, असे ते म्हणाले. बँक कर्ज, खत, बियाणे, तांत्रिक सल्ला, सिंचन, मृद परिक्षण या सर्व बाबी लिंकअप करुन लावणीपासून ते काढणीपर्यंतची नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.जिल्ह्याचे सरासरी उत्पन्न हेक्टरी २० क्विंटल असून येत्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्न २३ ते २५ क्विंटल दर हेक्टरी वाढविण्याचे उद्दिष्टय कृषि विभागाने निश्चित करावे व यासाठी एसओपी व सुक्ष्म नियोजन तयार करण्याचे निर्देश त्यांनी कृषि विभागाला दिले. कृषिला सर्वोच्य प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, पाण्याचा थेंब न थेंब साठविणे, शेती उत्पन्न वाढविणे यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)