शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

देशाच्या विकासात हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 8:58 PM

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : साकोली येथे शामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शामरावबापू कापगते जन्म शताब्दी महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व शामरावबापू सोबत काम केलेल्या निवडक ज्येष्ठ २० कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रविवारला साकोली येथे पार पडला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनंवता राऊत, माजी आमदार हेमंत पटले, डॉ. राधेश्याम अग्रवाल, मोहन अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, श्यामजी झिंगरे, दादासाहेब टिचकुले, शिवराम गिºहेपुंजे, नेपाल रंगारी, होमराज पाटील कापगते, डॉ. शंकुतला कापगते आदी उपस्थित होते.ना. हंसराज अहीर यांनी शामरावबापू यांच्या जीवनावर भर घातला. त्यांच्या शेतीविषयक समस्याची जाण, शेती विकासाचे प्रयत्न, बालपणापासून संघाचे निष्ठावान प्रथम स्वंयसेवक, संघबंदीच्या काळात कारावास, कुळकायदा विरोधी आंदोलनात सहभाग, सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजात जनजागृती, समाजोन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, महाराष्ट्र विधानसभेवर जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार, आणिबाणीच्या काळात नागपूर येथे कारावास, अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व, अशा अनेक कार्याची आठवण केली.ते म्हणाले, भारत देश लोकशाहीला मानणारा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुसंकारीत चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनु शकला. देशात आंतकवादी, नक्षलवादी हल्ले होत आहे. यावर आळा बसण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. देशात शांतता व सुव्यस्थेसाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हेमकृष्ण कागपते यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठान केलेल्या कार्याची माहिती दिली. आभार नगरसेवक अ‍ॅड.़ मनिष कागपते यांनी मानले. याप्रसंगी साकोली तालुक्यासह परजिल्ह्यातील नागरीक व शामरावबापू कागपते प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर