काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: June 23, 2014 23:43 IST2014-06-23T23:43:25+5:302014-06-23T23:43:25+5:30
केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केल्याच्या विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची

काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
रेल्वे दरवाढीचा विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केल्याच्या विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, मधुकर लिचडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात आणि मालभाड्यात कधी नव्हे एवढी प्रचंड भाववाढ करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत टाकले आहे.
या दरवाढीमुळे जनतेवर मोठा बोजा पडणार आहे. याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो. ही भाववाढ जनतेची क्रूर थट्टा असून तातडीने दरवाढ रद्द करण्यात यावी अन्यथा नागरिकांसह काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
मोर्चात सेवक वाघाये, प्रमिला कुटे, शेषराव गिऱ्हेपुंजे, प्रेमसागर गणवीर, शफी लद्धानी, सीमा भुरे, मधुश्री गायधने, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, माणिकराव ब्राम्हणकर, विठ्ठलराव कहालकर, सुरेंद्र पाटील, प्रभू मोहतुरे, मार्तंड भेंडारकर, अनिक जामा पटेल, अजय गडकरी, उमराव आठोडे, मनोज बागडे, नितीन बागडे, अजय ब्राम्हणकर, सुरेश गोन्नाडे, गणेश लिमजे, गणेश पून, रामदास राऊत, प्यारेलाल वाघमारे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्याशी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. त्यानंतर मोर्चाची रितसर सांगता करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)