सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवू

By Admin | Updated: June 23, 2014 23:43 IST2014-06-23T23:43:48+5:302014-06-23T23:43:48+5:30

विकास देश हितासाठी महत्वाची बाब असली तरी समाज विकासातूनच देश विकासाची पे्ररणा लाभते. त्यामुळे गावपातळीवर सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवून असे मत खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Concept of all-round development | सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवू

सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवू

लाखांदुरात कार्यक्रम : सत्कार समारंभात पटोलेंचे प्रतिपादन
भंडारा : विकास देश हितासाठी महत्वाची बाब असली तरी समाज विकासातूनच देश विकासाची पे्ररणा लाभते. त्यामुळे गावपातळीवर सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवून असे मत खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.
येथील मिरा कन्हैय्या मंगल कार्यालयात अखिल खेडुले कुणबी समाजाचे वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार नामदेवराव, अध्यक्ष नागपूर रामकृृष्ण ढेंगरी, वामन बेदरे, वसंता ऐंचिलवार, ईश्वर घोरमोढे, रामभाऊ दिवळे, यशवंत कुथे, अभय सिंगाडे, नलिनी खरकाटे, नलू दोनाडकर, ज्योती राऊत, विनोद ठाकरे, कुंता माकडे, नूतन कांबळे, दामोधर बुराडे, वासूदेव तोंडरे, वाजू टहलानी, देवीदास राऊत व शेकडो समाज बांधव यावेळी उपस्थित होते. पुढे म्हणाले शेती पिक विमा नवीन धोखा.
इंग्रजी कालीन पद्धत बदलविण्यासंदर्भात तसेच शेतीविषयक नाविण्यपूर्वक उद्योगधंदे सुरू करून समाजाच्या तसेच युवक वर्गाच्या रोजगारासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे बोलले. अखिल खेडूळे कुणबी समाजाचे वतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच पेन्सनर्स अशोसिएशन तसेच चैतन्य महिला बचत गट अंतरगावच्या वतीने सुद्धा खा.नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यात अखिल खेडूळे कुणबी समाजाचा सभामंडप व्हावा म्हणून २५ लाखाचा निधी मिळवून देणार तसेच यानंतर छावा संग्राम परिषदेच्या माध्यमातून पार पडणारे सामूहिक विवाह सोहळे हे अखिल खेडूळे कुणबी समाजाचे बॅनरखाली पार पडणार असल्याचे सांगितले. यासाठी दामोधर पारधी, रामचंद्र राऊत, सुखदेव ठाकरे, संजय प्रधान, यशपाल बगमारे, प्रविण राऊत यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. ( प्रतिनिधी)

Web Title: Concept of all-round development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.