वर्षभरापासून बांबू पुरवठा बंद

By Admin | Updated: January 22, 2015 00:32 IST2015-01-22T00:32:24+5:302015-01-22T00:32:24+5:30

हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना वापरून तयार करण्यात येणारे टोपली, सुप, बेंडवा, परडा, थाटरा व ढोली बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आदिवासी...

Closed bamboo supply from year to year | वर्षभरापासून बांबू पुरवठा बंद

वर्षभरापासून बांबू पुरवठा बंद

अड्याळ : हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना वापरून तयार करण्यात येणारे टोपली, सुप, बेंडवा, परडा, थाटरा व ढोली बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आदिवासी बांधव, बुरड कामगार वर्षभरापासून बांबू न मिळाल्याचे बेरोजगार आहेत.
पवनी तालुक्यातील अड्याळ गावात ४० ते ५० कुटुंब परंपरागत व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. नानाविध मानवोपयोगी आपली उत्पादने सूर्य निघण्याच्या अगोदर खेडोपाडी जावून विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा बुरड व्यवसायीक कधी बांबूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे तर कधी वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे येथील बुरड कामगाराच्या कचाट्यात सापडला असल्याची माहिती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आशिक नैताम यांनी सांगितले.
बुरड कारागिरांना वारंवार निवेदन भेटी घ्यायला विनंती करायला वनविभाग कार्यालयाचे दर्शन होतेच. एवढे होऊन सुद्धा परसाला पाणे तीनच यामुळे नाईलाजाणे येथील कारागीर एखाद्या शेतातील बासाची रांज दुप्पट रक्कम शेतमालकाला देवून आपल्या पोटाची भुक शांत करताना दिसतात. आदिवासी बांधव जेव्हा जेव्हा आपली समस्या घेवून वनविभागात पोहचले तेव्हा तेव्हा येथील अधिकाऱ्यांनी नुसते न दिसणारे समाधान यावरच समाधानी कले. आदिवासी बांधवाच्या दिशा व दशा याकडे येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे का? जर असेल तर नुसत्या बांबुसाठी १२ महिने लोटले असते का? आदिवासी बुरड कामगार कारागिरांच्या समस्या पाहता त्यांना बांबुचा पुरवठा संबंधित विभागाने त्वरित करावे, अशी मागणी अड्याळ येथील बुरड कारागिरांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Closed bamboo supply from year to year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.