शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भंडारा ते पवनी राज्यमार्गाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : कारधा ते निलज महामार्गाचे बांधकाम गत काही महिन्यापासून सुरू आहे. या निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीचा फटका नागरिकांना बसत असून अपघातातही वाढ झाली आहे.
महामार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असून एकेरी वाहतुकीचा फटका अनेक वाहनांना बसत आहे. त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्यावरील धुळीमुळे हजारो नागरिकांना प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य नियंत्रण समिती कार्यकर्त्यांनी वैनगंगा पूल ते बेटाळा गावापर्यंत तात्पुरती रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन पवनी तहसीलदारांना देण्यात आले.
कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ता तयार करण्यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाही. एका बाजुला रस्ता तयार होत असताना दुसऱ्या बाजूला मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून यावरुन शेकडो वाहने धावतात. मात्र वाहन चालकांना कायम अपघाताची भीत असते. डोळ्यात धूळ उडत असल्याने समोरचे दिसतही नाही. दूचाकी चालकांना तर या रस्त्यावरुन जाणे म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्त्याच्या जलद गतीने कामासाठी मनोहर मेश्राम, शंकर तेलमासरे, अवनती राऊत, अरविंद धारगावे, सय्यद ताजुद्दीन, प्रकाश भोंगे, महादेव शिवरकर, रमेश मोटघरे, राजू गणवीर, अनिल मेश्राम, आनंदविलास रामटेके, जगन्नाथ मुंडले, प्यारू तलमले, नत्थु हटवार, संतोष लांजेवार यांनी पवनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

अपघात वाढले
निर्मानाधीन रस्त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. गत आठवड्यात ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाचा अपघात होऊन दोन जण ठार झाले होते. दुचाकी अपघातातही वाढ झाली आहे. वाहन चालकांना येथे मोठी कसरत करावी लागते.