शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM

कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भंडारा ते पवनी राज्यमार्गाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कारधा ते निलज महामार्गाचे बांधकाम गत काही महिन्यापासून सुरू आहे. या निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीचा फटका नागरिकांना बसत असून अपघातातही वाढ झाली आहे.महामार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असून एकेरी वाहतुकीचा फटका अनेक वाहनांना बसत आहे. त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्यावरील धुळीमुळे हजारो नागरिकांना प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य नियंत्रण समिती कार्यकर्त्यांनी वैनगंगा पूल ते बेटाळा गावापर्यंत तात्पुरती रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन पवनी तहसीलदारांना देण्यात आले.कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ता तयार करण्यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाही. एका बाजुला रस्ता तयार होत असताना दुसऱ्या बाजूला मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून यावरुन शेकडो वाहने धावतात. मात्र वाहन चालकांना कायम अपघाताची भीत असते. डोळ्यात धूळ उडत असल्याने समोरचे दिसतही नाही. दूचाकी चालकांना तर या रस्त्यावरुन जाणे म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्त्याच्या जलद गतीने कामासाठी मनोहर मेश्राम, शंकर तेलमासरे, अवनती राऊत, अरविंद धारगावे, सय्यद ताजुद्दीन, प्रकाश भोंगे, महादेव शिवरकर, रमेश मोटघरे, राजू गणवीर, अनिल मेश्राम, आनंदविलास रामटेके, जगन्नाथ मुंडले, प्यारू तलमले, नत्थु हटवार, संतोष लांजेवार यांनी पवनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.अपघात वाढलेनिर्मानाधीन रस्त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. गत आठवड्यात ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाचा अपघात होऊन दोन जण ठार झाले होते. दुचाकी अपघातातही वाढ झाली आहे. वाहन चालकांना येथे मोठी कसरत करावी लागते.