शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’ शाळांना मिळणार केंद्राचा पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2016 00:36 IST

केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर गौरव३१ जुलैपर्यंत नोंदणी, शासकीय व अनुदानित शाळा पात्र भंडारा : केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ मिळावा यासाठी १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. केंद्राने या विशेष अभियानाची दखल घेत राज्याचा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर लागू केला आहे. देशाची भावी पिढी शाळामध्ये आकार घेत असते. मुलांना लहान वयात लागलेल्या सवयी आयुष्यभर पुरतात. स्वच्छतेची सवय जर शाळेतील मुलांना लागली तर येणारी पिढी ही आरोग्य संपन्न व सुदृढ निपजेल. म्हणूनच असे कार्यक्रम हाती घेवून ते यशस्वी करण्याचा मानस या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाने व्यक्त केला आहे. या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर १०० शाळा, राज्य पातळीवर ४० शाळा आणि जिल्हा पातळीवर ४८ शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यातील ७० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील शाळांना देण्यात येतील. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित करण्यात आले आहेत. शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांची श्रेणी निश्चित करण्यात येईल व त्यावरूनच पुरस्कार विज्येत्या शाळेची निवड केली जाईल. शाळांना ३१ जुलैपूर्वी या पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. शाळांमधील संस्कार कायमस्वरूपी राहतील असा या मागचा उद्देश आहे. (शहर प्रतिनिधी) पुरस्कारासाठी व्हीसीशिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ५ जुलैला खास व्हीसी लावून याबाबत माहिती दिली. यावेळी उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, विद्या परिषदचे संचालक गोविंद नांदेडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग, युनीसेफचे आनंद बोरसे, सिद्धेश वाडकर यावेळी उपस्थित होते. निवड समितीचे गठणतालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शाळा निवडीसाठी समित्या गठीत करण्यात येईल. तालुकास्तर समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यस्तर समितीचे अध्यक्ष शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत.गुणांचे निकष व संकेत ९० ते १०० गुण हिरवा रंग ७५ ते ८९ गुण निळा रंग ५१ ते ७४ गुण पिवळा रंग३५ ते ५० गुण केशरी रंग३५ पेक्षा कमी लाल रंगव्हीडीओ कॉन्फरन्सीगमधून शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.-किसन शेंडे, शिक्षणाधिकारी भंडारा.शासनाचा हा स्तूत्य उपक्रम आहे. उशिरा का होईना एकदाचा स्वच्छ शाळांना पुरस्कार मिळतील. स्वच्छ, सुंदर व आदर्श शाळा ठेवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची ही पोचपावती ठरणार आहे. पुरस्कार मिळणार असल्याने शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे.-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.