शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लोकसहभागातून प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, गवळी यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देनरेश गीते : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्स

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी लोकसहभागातून लोकचळवळीच्या रूपाने राबविण्यात येत असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाद्वारे जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, गवळी यांची उपस्थिती होती. स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून दोन टप्यात ग्रामीण व शहरी विभागात केली जात आहे. या अभियानाला मागील दोन वर्षात लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत ग्रामीण विभागात तसेच नगर पंचायतपासून तर नगर परिषदेपर्यंत शहरी विभागात या स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करून शाश्वत स्वच्छतेकरिता विविध उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी मात्र जिल्ह्यातील गावे प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प या अभियानाद्वारे करण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी विभागात हे अभियान राबविण्यात यावे, तसेच दोन्ही टप्यात जिल्हयातील सगळया यंत्रणांनी सामुहिक प्रयत्नातून या अभियानाद्वारे जिल्ह्यातील गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पहिल्या टप्या ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व शहरीविभागात विविध संवाद उपक्रम राबवून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. समुदाय संघटन करण्यात यावे. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हाभर ग्राम पंचायत, शाळा, विद्यालय, महाविद्यालयस्तरावर विविध घटकांच्या सहभागातून प्लॉस्टीक गोळा करण्यासाठी शपथ व महाश्रमदान करण्यात यावे. गाव व शासकिय कार्यालये प्प्लास्टिकमुक्त करण्यात यावे असे निर्देश दिले.त्यानंतर दुसरा टप्पा ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत राबवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी विभागात गोळा करण्यात आलेला प्लॉस्टीक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात यावे. हा कचरा डपींग ग्राउंडमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकत्रीत झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा पुर्नवापर, सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये वापर, औष्णीक विद्युत केंद्र किंवा रस्ते बांधणीसाठी उपयोगात आणण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.जिल्ह्यातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी ग्राम पंचायत, नगरपंचायत, नगर परिषद यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शासकिय व निमशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे संघटन, स्थानिक लोकप्रतिनिधी, खेळाडू यांनी सहभागी होवून गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

टॅग्स :environmentपर्यावरण