शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लोकसहभागातून प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, गवळी यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देनरेश गीते : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्स

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी लोकसहभागातून लोकचळवळीच्या रूपाने राबविण्यात येत असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाद्वारे जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, गवळी यांची उपस्थिती होती. स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून दोन टप्यात ग्रामीण व शहरी विभागात केली जात आहे. या अभियानाला मागील दोन वर्षात लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत ग्रामीण विभागात तसेच नगर पंचायतपासून तर नगर परिषदेपर्यंत शहरी विभागात या स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करून शाश्वत स्वच्छतेकरिता विविध उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी मात्र जिल्ह्यातील गावे प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प या अभियानाद्वारे करण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी विभागात हे अभियान राबविण्यात यावे, तसेच दोन्ही टप्यात जिल्हयातील सगळया यंत्रणांनी सामुहिक प्रयत्नातून या अभियानाद्वारे जिल्ह्यातील गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पहिल्या टप्या ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व शहरीविभागात विविध संवाद उपक्रम राबवून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. समुदाय संघटन करण्यात यावे. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हाभर ग्राम पंचायत, शाळा, विद्यालय, महाविद्यालयस्तरावर विविध घटकांच्या सहभागातून प्लॉस्टीक गोळा करण्यासाठी शपथ व महाश्रमदान करण्यात यावे. गाव व शासकिय कार्यालये प्प्लास्टिकमुक्त करण्यात यावे असे निर्देश दिले.त्यानंतर दुसरा टप्पा ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत राबवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी विभागात गोळा करण्यात आलेला प्लॉस्टीक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात यावे. हा कचरा डपींग ग्राउंडमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकत्रीत झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा पुर्नवापर, सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये वापर, औष्णीक विद्युत केंद्र किंवा रस्ते बांधणीसाठी उपयोगात आणण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.जिल्ह्यातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी ग्राम पंचायत, नगरपंचायत, नगर परिषद यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शासकिय व निमशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे संघटन, स्थानिक लोकप्रतिनिधी, खेळाडू यांनी सहभागी होवून गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

टॅग्स :environmentपर्यावरण