शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या तडाख्याने बाजारात फुलकोबीला चार रुपये किलो दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. फुलकोबी, पानकोबी, भेंडी, मिरची आदींची लागवड करण्यात आली.

ठळक मुद्देवाहतुकीचा खर्चही निघणे कठीण । बाजारपेठेत फुलकोबीची मोठी आवक

मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कांद्याचे दर वाढल्याने कंठशोष करणारे आता भाजीपाल्याचे दर घसरल्यानंतर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतातील कोबीला तर बाजारात केवळ चार रुपये किलो दर मिळत आहे. शेतापासून बाजारपेठेत नेण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. फुलकोबी, पानकोबी, भेंडी, मिरची आदींची लागवड करण्यात आली. मात्र गत १० दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला. त्यातच ढगाळ वातावरणाने फुलकोबी एकाचवेळी काढायला आली. वरुन पाण्याचा माराही झाला. शेतात फुलकोबी सडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ही कोबी बाजारात विक्रीसाठी नेली. मात्र गोबीचा व्यापाºयांनी लावलेला भाव पाहून शेतकºयांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय काहीच उरले नाही. बाजारात चार ते पाच रुपये किलोने विक्री होत आहे.
पालांदूर परिसरात शेतकºयांनी बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने फुलकोबीची लागवड केली होती. त्यात टप्प्याने फुलकोबी निघणे अपेक्षित होते. परंतु निसर्गाने दगा दिला आणि सर्व कोबी एकाच वेळेस काढायला आली. काढणी, वाहतूक खर्च वगळता शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही.एकदम भाव पडल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कांद्याचे भाव आकाशाला भिडले तेव्हा सर्वच जण कंठशोष करीत होते. मात्र आता फुलगोबीसह इतर भाजीपाल्याचे दर खाली आले तरी कुणी शब्द बोलायला तयार नाही. राबराब राबून एखाद्या वेळेस भाजीपाला पिकाला चांगला दर मिळतो तेव्हा सर्व ओरडतात. परंतु बाजारात भाजी विकल्या जात नाही आणि रस्त्यावर जनावरांना टाकावी लागते तेव्हा मात्र कुणी बोलत नाही असे अनेक शेतकरी सांगत होते.

टॅग्स :agricultureशेती