शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

तोडणीही परवडेना; हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी

By युवराज गोमास | Published: May 02, 2024 8:17 PM

बाजारात मिरचीचे भाव कोसळले : शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना

भंडारा: शेतकरी सध्या अवकाळी वादळी पाऊसाने तसेच शेतमालाचे भाव कोसळल्याने चांगलाच संकटात सापडला आहे. बाजारात हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत ३० रूपयांचा भाव मिळतो आहे. परिणामी हिरव्या मिरच्यांनी तोड्याअभावी झाडावरच नांगी टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हीच स्थिती लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर २५० ते ३०० रूपयांपर्यंत कडाडणारी लाल मिरची यंदा १५० रूपयांपर्यंत खाली उतरली आहे.अवकाळी संकटाशी दोन हात करून बळीराजा शेती फुलवीत आहे. परंतु, घामाच्या थेंबांनी शेती हिरवीगार करणारा बळीराजा यंदा मात्र बाजारभाव गडगडल्याने पुरता खचला आहे. पडलेल्या बाजारभावाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला. प्रति क्विंटल तीस हजार रुपयांपर्यंत भाव होता. उत्पादन अल्प झालं होतं. मात्र वाढलेल्या बाजारभावाने शेतकरी फायद्यात राहिले. मिरचीला मिळालेला योग्य भाव बघता यावर्षी जिल्ह्यात मिरचीचा पेरा वाढला. तुलनेत उत्पादन मोठे झाले. मात्र, बाजारभाव कोसळला. हिरव्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरची तोडणीचा खर्चही यातून भागताना दिसत नाही. घर खर्च चालविण्याची ऐपतही मिरची उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली नाही.

स्थानिक मजुरांच्या रोजगाराला फटका

सध्या शेतशिवारात मिरची तोडणी शेवटच्या टप्पा सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहाटे ७ ते १२ वाजेपर्यंत मजूर मिरची तोडतात. यातून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळत असते. मिरचीमुळे स्थानिक मजुरांच्या हातांना रोजगार मिळतो. परंतु, भाव गडगडल्याने स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम जाणवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक खर्च परवडणारा नसल्साने तोडणी बंद केली आहे.

खर्च लाखाचा, उत्पन्न मात्र अत्यल्प

मिरची लागवडीसाठी एका एकराला साधारणता एक लाखाच्यावर खर्च अपेक्षित असते. परंतु, सध्या पडलेल्या भावामुळे मिरची लागवडीसाठी लावलेला खर्चही निघेना अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरची पिकाने दिलेला आर्थिक दगाफटका बघता पुढील वर्षी पेरा कमी होण्याची शक्यता शेतकरी श्रीकृष्ण वनवे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी