शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सातवी पास असाल तरच होणार सरपंच; निवडणूक विभागाच्या अटीने अनेकांचा उत्साह मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2022 14:55 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले

भंडारा : जिल्ह्यात ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २० डिसेबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. यावेळी थेट जनतेमधून सरपंचपद निवडून येणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मात्र, थेट सरपंच व सदस्यपदासाठी किमान सातवी पास ही अट असल्याने काहींच्या उत्साहावर मात्र पाणी फेरले गेले आहे.

निवडणुकीत सदस्य किंवा सरपंचपदाची निवडणूक लढविणारा उमेदवार १ जानेवारी १९९५ रोजी किंवा यानंतर जन्माला आलेला असेल, तर तो किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय थेट सरपंच म्हणून निवडून आलेले व्यक्ती ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असल्याने सदस्यांसाठी असणारी सातवी पास ही अट त्यालाही लागू राहणार असल्याचे निवडणूक विभागाने निर्देशित केले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना जन्मतारखेचा व शैक्षणिक पात्रतेचा पुरावा जोडावा लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता अनामत रक्कम रोखीने भरावी लागणार आहेत.

स्वतंत्र खाते आवश्यक

ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागेल. त्यामुळे स्वतंत्र खाते उघडण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

तर यांना द्यावा लागणार राजीनामा

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना शासनाकडून मानधन दिले जाते. सेविकांना शासनाकडून मानधन दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मानधन पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनामा न दिल्यास सेवेतून काढण्याचे निर्देश निवडणूक विभागाने यापूर्वीच दिले आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गाज पडण्याची शक्यता

मागील आरक्षणात घोळ झाल्याचे कारणावरून ग्रामविकास विभागाच्या पत्रान्वये निवडणूक विभागाने मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित केल्या. याशिवाय सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत मोठ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर गाज पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, निवडणूक थांबल्याने सर्वत्र राजकीय शुकशुकाट आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग