शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन?

By युवराज गोमास | Updated: March 5, 2024 16:51 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न : तलावांचे खोलीकरण व अतिक्रमण निर्मुलन गरजेचे

भंडारा : जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १३१० आहे. शहरीकरण व गावांचा विस्तार झाल्याने काही तलाव आता नामशेष आहेत. त्यातच शेतशिवार व निसर्गाच्या सानिध्यातील तलावांनाही घरघर लागली आहे. वर्षांनुवर्षांपासून साचलेल्या गाळाने तलाव उथळ झाले आहेत. तलावांच्या पोटात अनेक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे तलावांची सिंचन क्षमता जेमतेम आहे. सातबारावर सिंचन सुविधेचा शेरा असला तरी सिंचनाचा अभाव दिसून येत आहे.

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आदी सातही तालुक्यांत तलावांची संख्या मोठी आहे. परंतु, ही ओळख आता पुसट होत चालली आहे. डोंगर टेकड्याच्या सानिध्यात असलेले मोठे तलाव तग धरून आहेत. मात्र, शेतशिवारातील लहान तलाव केवळ हंगामी आहेत. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे या तलावांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच लोकसहभागाचा अभाव असल्याने स्थिती गंभीर झाली आहे. परिणामी तलावांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तलावांचे संवर्धनासाठी शासन-प्रशासनाच्या पुढाकाराची व लोकसहभागाची नितांत गरज आहे.

जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तलाव, बोड्यांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात सिंचनाचा व भूजलाचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. तलाव सिंचनासोबत पशु-पक्षी आदींसाठी महत्वपूर्ण आहेत.

जलयुक्त शिवाराची व्याप्ती वाढवा

मागीलवेळी जलयुक्त शिवारातून अनेक तलावांचे खोलीकरण झाले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. करडी येथील गोटाळी तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा पडायचा. आता खोलीकरणामुळे उन्हाळ्यात जलसाठा दिसून येतो. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे तलावांचे पुनर्जीवन शक्य आहे. गरज आहे ती योजनेची व्याप्ती वाढविण्याची.

तर ग्रामीण जलसंकट होणार दूर

तलाव जिवंत राहिल्यास कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केले जाऊ शकतात. पाण्यामुळे ६० टक्के उत्पादकता वाढते. जनावरांच्या पिण्याचा तर मानवाच्या वापराच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. ग्रामीण जलसंकट यामुळे दूर केले जाऊ शकते. मरनासन्न तलावांची दुरुस्ती त्यासाठी आवश्यक आहे.

तलावांचे खोलीकरण व संवर्धन होणे मानवासह पशुपक्ष्यांसाठी आवश्यक आहे. यामुळे पाण्या दुर्भिक्षता संपूर्ण भूजलसाठा वाढेल. शेतीचे सिंचन वाढून पाणी टंचाई संपण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील.हितेश सेलोकर, शेतकरी माटोरा.