शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:00 AM

भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे७० कोटी मंजूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या निधीतून ५.८ किमी रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे आता भाग्य फळफळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५.८ किमी हायवे आता फोरवे होणार आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ही माहिती दिली. भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना  दिली.या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते. 

सहा महिन्यात  १५८ रस्ते अपघात- जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीपेक्षा अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग