शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

उन्हाळ्यात ग्रामीणसह भंडारा शहर सुद्धा जलसंकटाच्या सावटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:26 IST

कृती आराखडा तयार, पण अंमलबजावणी केव्हा? : ३०१ कामे अपूर्णावस्थेत असल्याची माहिती विभागाने दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कागदावर टँकरमुक्त असला तरी उन्हाळ्यात प्रत्यक्षात ग्रामीण भागातील अनेक गावांसह भंडारा शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन नळ योजना, नळ दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, विहिरींचे खोलीकरण आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे पाणीटंचाइची समस्या वाढणार आहे. 

२५ गावांना बसते पाणीटंचाईची झळभंडारा जिल्ह्यातील २५ गावांमध्ये दरवर्षी जलसंकट निर्माण होते. जिल्ह्याला टँकरमुक्त घोषित करण्यात आले असले तरी भंडारा शहरातील काही वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल-मे महिन्यात टंचाईची झळ जाणवू लागते, त्यामुळे उपाययोजना सुरू होणे गरजेचे आहे.

आता पुढाकाराची गरजदरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांची यादी प्रशासनाकडे आहे. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी आराखडा नव्याने सादर केला जातो. दरवर्षी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर होतो, पण तात्पुरत्या योजना राबवल्यानंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. प्रशासनाकडे यासंदर्भात पुरेशी माहिती असूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा