शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उन्हाळ्यात ग्रामीणसह भंडारा शहर सुद्धा जलसंकटाच्या सावटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:26 IST

कृती आराखडा तयार, पण अंमलबजावणी केव्हा? : ३०१ कामे अपूर्णावस्थेत असल्याची माहिती विभागाने दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कागदावर टँकरमुक्त असला तरी उन्हाळ्यात प्रत्यक्षात ग्रामीण भागातील अनेक गावांसह भंडारा शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन नळ योजना, नळ दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, विहिरींचे खोलीकरण आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे पाणीटंचाइची समस्या वाढणार आहे. 

२५ गावांना बसते पाणीटंचाईची झळभंडारा जिल्ह्यातील २५ गावांमध्ये दरवर्षी जलसंकट निर्माण होते. जिल्ह्याला टँकरमुक्त घोषित करण्यात आले असले तरी भंडारा शहरातील काही वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल-मे महिन्यात टंचाईची झळ जाणवू लागते, त्यामुळे उपाययोजना सुरू होणे गरजेचे आहे.

आता पुढाकाराची गरजदरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांची यादी प्रशासनाकडे आहे. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी आराखडा नव्याने सादर केला जातो. दरवर्षी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर होतो, पण तात्पुरत्या योजना राबवल्यानंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. प्रशासनाकडे यासंदर्भात पुरेशी माहिती असूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा