शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे
By Admin | Updated: February 11, 2015 00:42 IST2015-02-11T00:42:11+5:302015-02-11T00:42:11+5:30
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, ...

शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे
साकोली : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी व्यक्त केले.
नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोलीच्या प्रांगणात महसूल विभागातर्फे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियान विस्तारित स्वरूपातील समाधान योजना कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले होते. अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. हंसा गोहणे, सभापती नारायण वरठे, उपसभापती श्रावण बोरकर, पंचाय समिती सदस्य यादोराव कापगते, जिल्हा परिषद सदस्य सुनिता कापगते, जया भुरे, कृषी अधिकारी चौधरी, खंडविकस अधिकारी व्ही.टी. बोरकर, नायब तहसिलदार दिनकर खोत, पवार व जी. एस. मासुरकर उपस्थित होते.
प्रास्ताविक तहसिलदार डॉ. हंसा मोहणे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, तीन वर्षापासून तालुक्यातील सर्वच कामाची नोंद बुक मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत जातीचे दाखले २ हजार ६०२, रहिवासी दाखले १ हजार ४७०, उत्पन्नाचे दाखले पाच हजार ६५, ९४ गावात चावडी वाचन करून ३८७ मय्यत खातेदार व १८० वारस फेरफार प्रकरणे आहेत. दोन हजार वनजमिनीचे अर्ज प्राप्त व ३८७ पट्टे वाटप, १ हजार २३० लाभार्थ्यांना नवीन राशनकार्ड वाटप, संजय गांधी योजना ५५०, श्रावणबाळ ४५०, राष्ट्रीय कुटूंब योजना १०० प्रकरणे व आम आदमी १६५ प्रकरणे मंजूर करून लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महसूल विभागातर्फे १२२, कृषी विभाग ७३, भूमिअभिलेख कार्यालय ६७, बालविकास कार्यालय ८८, पशुसंवर्धन विभाग ११९, पंचायत समिती ५५, आरोग्य विभाग १३०, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना २७ प्रकरणे यावेळी तात्काळ पूर्ण करण्यात आले असून ही कामे या कार्यक्रमाची यशस्विताच म्हणावी लागेल, असे मत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन साकोलीचे मंडळ अधिकारी निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन तलाठी शिंदे व तलाठी ठाकरे यांनी केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)