शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धक्कादायक ! बावनथडी नदी मृत होण्याच्या मार्गावर; तस्करांच्या वॉच सिस्टीमपुढे यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:41 IST

सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देरेती उत्खननाचा फटका

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेशाला भिडल्या असून, दोन्ही राज्यांच्या सीमेतून बावनथडी नदी वाहते. वर्षातून आठ महिने ही नदी कोरडी राहते. दोन्ही राज्यातील रेती तस्कर नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करीत आहेत. मनमानी केलेल्या उपश्यामुळे नदीच मृत होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राजरोसपणे या नदीपात्राला रेती तस्करांनी ओरबडणे सुरू ठेवलेले आहे. काही ठिकाणी नदीपात्राने तळ गाठला आहे. मातीसुद्धा दिसत आहे. यामुळे निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी होत असून, रेती तस्करांच्या वॉच सिस्टीममुळे नजर ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरत आहे.

बावनथडी नदीवर सितेकसा येथे धरण बांधण्यात आले आहे. वर्षातून या नदीपात्रात केवळ चार महिने पाण्याच्या प्रभाव सुरू राहतो, तर आठ महिने ही नदी कोरडी राहते. या संधीचा फायदा घेत दोन्ही राज्यातील रेती तस्कर या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करतात. मध्य प्रदेश शासनाने आपल्या रेतीघाटांचा लिलाव केला, परंतु महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील नदी गटांचा लिलाव मागील दोन वर्षांपासून झालेला नाही.

देवनारा घाटातून रेती तस्करी

तुमसर तालुक्यात शेवटच्या टोकावर देवनारा हे गाव आहे. गावाच्या शेजारून बावनथडी नदी वाहते. सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

रेती तस्करांची वॉच सिस्टीम

सामूहिक रेती चोरी करण्याकरिता रेती तस्करांची स्वतःची एक वेगळी नेटवर्क आहे. त्याला रेती तस्करांची वॉच सिस्टीम असे कोडवर्डमध्ये म्हटले जाते. ही संपूर्ण यंत्रणा रेती तस्करांसाठी कार्यरत आहे. तस्करांनी व्हॉट्सॲप ग्रुप प्रणालीचा वापर केला आहे. त्याकरिता तरुण मंडळी या कामात गुंतलेली आहे. सहभागी तरुण एकमेकांना भ्रमणध्वनीवरून संदेश देतात. तिथे धाड मारल्यानंतर काहीच मिळत नाही. रेतीचा एक टिप्पर शहरात ३० हजारांना विक्री केला जातो.

पर्यावरणाचे नुकसान होत असताना महसूल प्रशासनाने रेती तस्करीवर आळा घालणे गरजेचे आहे. तरच नदीचे संरक्षण करता येईल.

-मो. सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :riverनदीenvironmentपर्यावरणsandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी