शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धक्कादायक ! बावनथडी नदी मृत होण्याच्या मार्गावर; तस्करांच्या वॉच सिस्टीमपुढे यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:41 IST

सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देरेती उत्खननाचा फटका

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेशाला भिडल्या असून, दोन्ही राज्यांच्या सीमेतून बावनथडी नदी वाहते. वर्षातून आठ महिने ही नदी कोरडी राहते. दोन्ही राज्यातील रेती तस्कर नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करीत आहेत. मनमानी केलेल्या उपश्यामुळे नदीच मृत होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राजरोसपणे या नदीपात्राला रेती तस्करांनी ओरबडणे सुरू ठेवलेले आहे. काही ठिकाणी नदीपात्राने तळ गाठला आहे. मातीसुद्धा दिसत आहे. यामुळे निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी होत असून, रेती तस्करांच्या वॉच सिस्टीममुळे नजर ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरत आहे.

बावनथडी नदीवर सितेकसा येथे धरण बांधण्यात आले आहे. वर्षातून या नदीपात्रात केवळ चार महिने पाण्याच्या प्रभाव सुरू राहतो, तर आठ महिने ही नदी कोरडी राहते. या संधीचा फायदा घेत दोन्ही राज्यातील रेती तस्कर या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करतात. मध्य प्रदेश शासनाने आपल्या रेतीघाटांचा लिलाव केला, परंतु महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील नदी गटांचा लिलाव मागील दोन वर्षांपासून झालेला नाही.

देवनारा घाटातून रेती तस्करी

तुमसर तालुक्यात शेवटच्या टोकावर देवनारा हे गाव आहे. गावाच्या शेजारून बावनथडी नदी वाहते. सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

रेती तस्करांची वॉच सिस्टीम

सामूहिक रेती चोरी करण्याकरिता रेती तस्करांची स्वतःची एक वेगळी नेटवर्क आहे. त्याला रेती तस्करांची वॉच सिस्टीम असे कोडवर्डमध्ये म्हटले जाते. ही संपूर्ण यंत्रणा रेती तस्करांसाठी कार्यरत आहे. तस्करांनी व्हॉट्सॲप ग्रुप प्रणालीचा वापर केला आहे. त्याकरिता तरुण मंडळी या कामात गुंतलेली आहे. सहभागी तरुण एकमेकांना भ्रमणध्वनीवरून संदेश देतात. तिथे धाड मारल्यानंतर काहीच मिळत नाही. रेतीचा एक टिप्पर शहरात ३० हजारांना विक्री केला जातो.

पर्यावरणाचे नुकसान होत असताना महसूल प्रशासनाने रेती तस्करीवर आळा घालणे गरजेचे आहे. तरच नदीचे संरक्षण करता येईल.

-मो. सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :riverनदीenvironmentपर्यावरणsandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी