शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

धक्कादायक ! बावनथडी नदी मृत होण्याच्या मार्गावर; तस्करांच्या वॉच सिस्टीमपुढे यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:41 IST

सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देरेती उत्खननाचा फटका

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेशाला भिडल्या असून, दोन्ही राज्यांच्या सीमेतून बावनथडी नदी वाहते. वर्षातून आठ महिने ही नदी कोरडी राहते. दोन्ही राज्यातील रेती तस्कर नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करीत आहेत. मनमानी केलेल्या उपश्यामुळे नदीच मृत होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राजरोसपणे या नदीपात्राला रेती तस्करांनी ओरबडणे सुरू ठेवलेले आहे. काही ठिकाणी नदीपात्राने तळ गाठला आहे. मातीसुद्धा दिसत आहे. यामुळे निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी होत असून, रेती तस्करांच्या वॉच सिस्टीममुळे नजर ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरत आहे.

बावनथडी नदीवर सितेकसा येथे धरण बांधण्यात आले आहे. वर्षातून या नदीपात्रात केवळ चार महिने पाण्याच्या प्रभाव सुरू राहतो, तर आठ महिने ही नदी कोरडी राहते. या संधीचा फायदा घेत दोन्ही राज्यातील रेती तस्कर या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करतात. मध्य प्रदेश शासनाने आपल्या रेतीघाटांचा लिलाव केला, परंतु महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील नदी गटांचा लिलाव मागील दोन वर्षांपासून झालेला नाही.

देवनारा घाटातून रेती तस्करी

तुमसर तालुक्यात शेवटच्या टोकावर देवनारा हे गाव आहे. गावाच्या शेजारून बावनथडी नदी वाहते. सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.

रेती तस्करांची वॉच सिस्टीम

सामूहिक रेती चोरी करण्याकरिता रेती तस्करांची स्वतःची एक वेगळी नेटवर्क आहे. त्याला रेती तस्करांची वॉच सिस्टीम असे कोडवर्डमध्ये म्हटले जाते. ही संपूर्ण यंत्रणा रेती तस्करांसाठी कार्यरत आहे. तस्करांनी व्हॉट्सॲप ग्रुप प्रणालीचा वापर केला आहे. त्याकरिता तरुण मंडळी या कामात गुंतलेली आहे. सहभागी तरुण एकमेकांना भ्रमणध्वनीवरून संदेश देतात. तिथे धाड मारल्यानंतर काहीच मिळत नाही. रेतीचा एक टिप्पर शहरात ३० हजारांना विक्री केला जातो.

पर्यावरणाचे नुकसान होत असताना महसूल प्रशासनाने रेती तस्करीवर आळा घालणे गरजेचे आहे. तरच नदीचे संरक्षण करता येईल.

-मो. सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :riverनदीenvironmentपर्यावरणsandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी