शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

हक्काच्या घरबांधणीसाठी नियमांची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी ...

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बेघरांना घरासाठी अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या स्वतंत्र योजना आहेत. पूर्वी घरकुल योजना फक्त बीपीएलधारकासाठी व ज्यांच्याकडे मालकीची जागा आहे, त्यांच्यासाठीच होती. यात सरकारी धोरणात बदल करून सर्वांना घरे ही योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत मालकीच्या जागेची अट शिथिल करून ग्राम पंचायतीच्या नमुना ९ वर नोंद असलेल्या अतिक्रमणधारकांना सरळ लाभ देण्याचे नियम बनविण्यात आले. यासाठी लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आर्थिक मदत व बांधकाम साहित्य मोफत पुरविण्यात येते. बांधकाम करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही.

याउलट मालकीच्या जागेवर हक्काचे घर बांधकाम करण्यासाठी अनेक नियमांचे पायबंद घालण्यात आले आहे. घर बांधकाम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीची स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेण्यात आले. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करणाऱ्यास अवैध ठरवण्यात येते. परवानगी असल्याखेरीज बँका कर्ज देत नाहीत. हक्काचे घर बांधण्यासाठी पैसे मोजून विकत घेतलेली जागा व स्वतःचे पैसे असूनही घर बांधता येत नाही. हक्काच्या जागेवर घर बांधण्यासाठी अनेक नियम लादले जातात आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेतल्याने बांधकामास इच्छुकांना तालुका व जिल्हा कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागतात आहेत.

राजकीय वरदहस्त वापरून कोणतीही जागा दफ्तरी नोंदवा आणि शासनाच्या पैशाने घर बांधा, असे धोरण असल्याने नागरिकांनी शासनाच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. नियमांनी चालणाऱ्यांना शासकीय दंड व नियमबाह्य काम करणाऱ्यांना सवलत अशी परिस्थिती राज्यात आहे. मालकीच्या जागेवर घर बांधणाऱ्यांना नियमांच्या ओझ्याखाली बांधले गेले आहे. परवानगीचा खर्च पूर्वीच्या तुलनेत १००० पटींनी वाढला आहे.

बॉक्स

अनेक प्रस्ताव धूळखात

दोन वर्षांपासून घर बांधकामाचे हजारो प्रस्ताव परवानगीच्या प्रतीक्षेत धूळखात आहेत. यामुळे बँकेना नियमित कर्ज वाटप करता येत नाही. घर बांधकाम कर्जाचे प्रकारणे रोडवल्याने बँकांना फटका बसला आहे.

रस्ते, नाले व महत्त्वाच्या जागा गायब

सर्वांना घर या योजनेसाठी गावागावांत अतिक्रमण झपाट्याने सुरू झाले आहे. मतदारांना खूश ठेवण्यासाठी व कधी वचपा काढण्यासाठी अनेकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन करण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करून परिचितांना खूश ठेवण्यासाठी खटाटोप करतात. अतिक्रमणाच्या वाढत्या प्रमाणाने गावातील रस्ते, पावसाचे पाणी वाहून जाणारे नहर व शासकीय जागा गायब झाली आहे.