शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या घरबांधणीसाठी नियमांची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी ...

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बेघरांना घरासाठी अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या स्वतंत्र योजना आहेत. पूर्वी घरकुल योजना फक्त बीपीएलधारकासाठी व ज्यांच्याकडे मालकीची जागा आहे, त्यांच्यासाठीच होती. यात सरकारी धोरणात बदल करून सर्वांना घरे ही योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत मालकीच्या जागेची अट शिथिल करून ग्राम पंचायतीच्या नमुना ९ वर नोंद असलेल्या अतिक्रमणधारकांना सरळ लाभ देण्याचे नियम बनविण्यात आले. यासाठी लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आर्थिक मदत व बांधकाम साहित्य मोफत पुरविण्यात येते. बांधकाम करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही.

याउलट मालकीच्या जागेवर हक्काचे घर बांधकाम करण्यासाठी अनेक नियमांचे पायबंद घालण्यात आले आहे. घर बांधकाम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीची स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेण्यात आले. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करणाऱ्यास अवैध ठरवण्यात येते. परवानगी असल्याखेरीज बँका कर्ज देत नाहीत. हक्काचे घर बांधण्यासाठी पैसे मोजून विकत घेतलेली जागा व स्वतःचे पैसे असूनही घर बांधता येत नाही. हक्काच्या जागेवर घर बांधण्यासाठी अनेक नियम लादले जातात आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेतल्याने बांधकामास इच्छुकांना तालुका व जिल्हा कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागतात आहेत.

राजकीय वरदहस्त वापरून कोणतीही जागा दफ्तरी नोंदवा आणि शासनाच्या पैशाने घर बांधा, असे धोरण असल्याने नागरिकांनी शासनाच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. नियमांनी चालणाऱ्यांना शासकीय दंड व नियमबाह्य काम करणाऱ्यांना सवलत अशी परिस्थिती राज्यात आहे. मालकीच्या जागेवर घर बांधणाऱ्यांना नियमांच्या ओझ्याखाली बांधले गेले आहे. परवानगीचा खर्च पूर्वीच्या तुलनेत १००० पटींनी वाढला आहे.

बॉक्स

अनेक प्रस्ताव धूळखात

दोन वर्षांपासून घर बांधकामाचे हजारो प्रस्ताव परवानगीच्या प्रतीक्षेत धूळखात आहेत. यामुळे बँकेना नियमित कर्ज वाटप करता येत नाही. घर बांधकाम कर्जाचे प्रकारणे रोडवल्याने बँकांना फटका बसला आहे.

रस्ते, नाले व महत्त्वाच्या जागा गायब

सर्वांना घर या योजनेसाठी गावागावांत अतिक्रमण झपाट्याने सुरू झाले आहे. मतदारांना खूश ठेवण्यासाठी व कधी वचपा काढण्यासाठी अनेकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन करण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करून परिचितांना खूश ठेवण्यासाठी खटाटोप करतात. अतिक्रमणाच्या वाढत्या प्रमाणाने गावातील रस्ते, पावसाचे पाणी वाहून जाणारे नहर व शासकीय जागा गायब झाली आहे.