शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हक्काच्या घरबांधणीसाठी नियमांची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी ...

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बेघरांना घरासाठी अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या स्वतंत्र योजना आहेत. पूर्वी घरकुल योजना फक्त बीपीएलधारकासाठी व ज्यांच्याकडे मालकीची जागा आहे, त्यांच्यासाठीच होती. यात सरकारी धोरणात बदल करून सर्वांना घरे ही योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत मालकीच्या जागेची अट शिथिल करून ग्राम पंचायतीच्या नमुना ९ वर नोंद असलेल्या अतिक्रमणधारकांना सरळ लाभ देण्याचे नियम बनविण्यात आले. यासाठी लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आर्थिक मदत व बांधकाम साहित्य मोफत पुरविण्यात येते. बांधकाम करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही.

याउलट मालकीच्या जागेवर हक्काचे घर बांधकाम करण्यासाठी अनेक नियमांचे पायबंद घालण्यात आले आहे. घर बांधकाम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीची स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेण्यात आले. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करणाऱ्यास अवैध ठरवण्यात येते. परवानगी असल्याखेरीज बँका कर्ज देत नाहीत. हक्काचे घर बांधण्यासाठी पैसे मोजून विकत घेतलेली जागा व स्वतःचे पैसे असूनही घर बांधता येत नाही. हक्काच्या जागेवर घर बांधण्यासाठी अनेक नियम लादले जातात आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकार काढून घेतल्याने बांधकामास इच्छुकांना तालुका व जिल्हा कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागतात आहेत.

राजकीय वरदहस्त वापरून कोणतीही जागा दफ्तरी नोंदवा आणि शासनाच्या पैशाने घर बांधा, असे धोरण असल्याने नागरिकांनी शासनाच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. नियमांनी चालणाऱ्यांना शासकीय दंड व नियमबाह्य काम करणाऱ्यांना सवलत अशी परिस्थिती राज्यात आहे. मालकीच्या जागेवर घर बांधणाऱ्यांना नियमांच्या ओझ्याखाली बांधले गेले आहे. परवानगीचा खर्च पूर्वीच्या तुलनेत १००० पटींनी वाढला आहे.

बॉक्स

अनेक प्रस्ताव धूळखात

दोन वर्षांपासून घर बांधकामाचे हजारो प्रस्ताव परवानगीच्या प्रतीक्षेत धूळखात आहेत. यामुळे बँकेना नियमित कर्ज वाटप करता येत नाही. घर बांधकाम कर्जाचे प्रकारणे रोडवल्याने बँकांना फटका बसला आहे.

रस्ते, नाले व महत्त्वाच्या जागा गायब

सर्वांना घर या योजनेसाठी गावागावांत अतिक्रमण झपाट्याने सुरू झाले आहे. मतदारांना खूश ठेवण्यासाठी व कधी वचपा काढण्यासाठी अनेकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन करण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करून परिचितांना खूश ठेवण्यासाठी खटाटोप करतात. अतिक्रमणाच्या वाढत्या प्रमाणाने गावातील रस्ते, पावसाचे पाणी वाहून जाणारे नहर व शासकीय जागा गायब झाली आहे.