पाण्याचा अपव्यय टाळा ; पुनर्वापर, बचतीची गरज
By Admin | Updated: July 14, 2014 23:46 IST2014-07-14T23:46:29+5:302014-07-14T23:46:29+5:30
जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा

पाण्याचा अपव्यय टाळा ; पुनर्वापर, बचतीची गरज
भंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाकांनी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे.
भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात.
ग्रामिण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाऱ्याने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर असून शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्रामीण भागात शिवकालीन पाणी साठवण योजना राबविणे गरजेचे आहे.
सामूहिक जबाबदारी
-ासार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळ तोट्यांची तातडीने दुरुस्ती करा.
-ायेत्या पावसाळ््यात छतावर पडणाऱ्या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या.
-जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे.
-नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून पुण्याची पुन्हा ‘ग्रीन सिटी’ ही ओळख निर्माण करावी.