शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

१४ ऑगस्टच्या क्रांतीने पेटविली स्वातंत्र्याची मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला.

ठळक मुद्देतुमसरमधील क्रांतीवीर : १४ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या गोळीबारात सहा जणांना आले होते वीरमरण

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सर्वत्र स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगत होता. त्याचे लोण तुमसरपर्यंतही पोहचले होते. १० ऑगस्ट १९४२ रोजी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. काहींना अटक झाली तर काही भूमीगत झाले. मात्र १४ ऑगस्ट रोजी तुमसरात मोठी मिरवणूक काढली. पोलिसांनी ही मिरवणूक अडवून लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जणांना वीरमरण आले, तर शेकडो जखमी झाले. तेथूनच खऱ्या अर्थाने तुमसरात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटली. शनिवारी १४ ऑगस्ट रोजी या लढ्यातील वीर क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला. १९३० साली जंगल सत्याग्रहातही तुमसर आघाडीवर होते. चिंचोली येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. मात्र १४ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारानंतर स्वातंत्र्याची मशाल आणखीनच धगधगली. १० ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. अनेकजण भूमीगत झाले. १४ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी तुमसरात मिरवणूक काढली. हजारो नागरिक सहभागी झाले. सुरुवातीला पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर न्यायाधीश जयवंत यांनी गोळीबाराचा आदेश काढला. त्यावेळी गोळीबार करण्यात आला. त्यात श्रीराम धुर्वे, भद्दू लोंदासे, श्रीहरी फाये, पांडूरंग सोनवाल, भुवाजी बानोरे, राजाराम धुर्वे यांना वीरमरण आले. तर शेकडो कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी त्यांची अंत्ययात्रा काढण्यासही नकार दिला. मात्र म.पो. दामले व इतरांनी दिलेल्या इशाऱ्याने सर्व मृतदेह ताब्यात देण्यात आले. डोंगरलात अंत्यसंस्कार झाले.स्वातंत्र्यवीरांच्या गौरवाचे स्मरणभारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाºया शूरविरांचे तुमसर येथे स्मारक उभारण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी राष्ट्रीय शाळेला भेट दिली. त्यांच्याच हस्ते शहीद स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर पंडीत मोतीलाल नेहरु, महात्मा गांधी, महात्मा भगवान दास, पंडीत सुंदरलाल, आचार्य कृपलानी, पट्टीभीसीतारामय्या, जयप्रकाश नारायण, प्रकाश, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाळगीळ आदींनी तुमसरला भेट देऊन येथील क्रांतीकारकांचा गौरव केला. तुमसर शहरातील हे शहीद स्मारक आज तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. १४ ऑगस्ट रोजी यानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण तुमसरातील नागरिक या स्मारकापुढे नतमस्तक होतात. तुमसर शहराने स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाला तोड नाही. त्याचा अभिमान आज प्रत्येक तुमसरकरांना आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन