शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:01 AM

नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवाशक्ती संघटना : नाग नदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. नागनदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवून वैनगंगा नदी प्रदूषित होण्यापासून वाचवा अशी मागणी करण्यात आली.नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नाग, कन्हान नदीद्वारे आंभोरा येथे अन्य चार नद्यांसह वैनगंगा नदीला मिळते. नागनदीमध्ये शहरातील सांडपाणी, कारखान्यातील रसायनयुक्त पाणी येते. तेच पाणी वैनगंगा नदीत मिसळते. नागपूर शहरातून दररोज ४२० दशलक्ष लिटर प्रतीदिन सोडले जाते. त्यापैकी नागपूर शहराजवळील भांडेवाडी येथे ८० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते तर उर्वरीत पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. नागनदीचे पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे असून त्याची दुर्गंधी येते. त्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. गोसेखुर्द धरणात २००९ पासून पाणी संचय सुरु आहे. नागनदीचे पाणी येथे थोपवून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.प्रदूषित नागनदी मिश्रीत वैनगंगा नदीच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढले असून गोसीखुर्द धरणातील पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनाही विविध आजार जडत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पवनी येथे वैनगंगा नदीपात्रात देवराज बावनकर यांच्या नेतृत्वात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवराज बावनकर, प्रशांत मोहनकर, दीपक बावनकर, सुनील हटवार, जयपाल वंजारी, मच्छींद्र हटवार, लिलाधर काटेखाये, योगेश बावनकर, गोपाल काटेखाये, सोनू समरीत, भगवान शेंडे, उमेश मोहरकर, लतीराज वाघमारे, मंगला बावनकर, भाग्यश्री येलमुले, आकाश हटवार, राहुल नंदनवार, अंकोश सावरकर, रवींद्र जांभोरकर, अभय लांजेवार, रुपलता वंजारी, कीर्ती काटेखाये, रेखा नागपुरे, लिना बावनकर आदी सहभागी झाले होते.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदननागपूर शहरातून येणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात उपाययोजना करावी यासाठी युवाशक्ती संघटनेने अर्धदफन आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना तहसील प्रशासनामार्फत निवेदन पाठविले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :riverनदी