शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका ...

तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका गावात गोधनाची तस्करी केली जात आहे. तेथून नागपूर व हैदराबाद येथे वाहनात डांबून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तस्करांचा दबदबा असल्याने त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होत असल्याने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोरोना संक्रमण काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराज्यीय गोधन तस्कारीच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातून गोधनाची चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यात वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील एका गावात तस्करीचा मोठा अड्डा झाला आहे.

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून बावनथडी नदी मार्गाने

गोधनाची वाहतूक तुमसर तालुक्यातील नदी काठावरील एका गावात करण्यात येते. तेथून ते गोधन नागपूर व हैदराबाद येथील कत्तलखान्यात जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक सर्रास सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.

यापूर्वी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व गोबरवाही येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातून येणारी जनावरांची वाहने अडवली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु कारवाईनंतर जनावरांच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.

तुमसर तालुक्यातील भूमिगत मॅग्ननीज खाण परिसरातील एका गावात मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती आहे. तस्करांचा दबदबा मोठा असल्यामुळे यांच्याविरोधात स्थानिक नागरिक पुढे येत नाहीत. संचारबंदी काळात जनावरांच्या तस्करीत मोठी वाढ झाली तरी प्रशासन याबाबत अनभिज्ञ दिसत आहे.

जनावरांची आंतरराज्य वाहतूक व कत्तलखान्याकडे रवानगी याचे कडक नियम अस्तित्वात असल्यावरही सर्रास गोधनाची कत्तलखान्याकडे रवानगी होत आहे. नियम केवळ कागदोपत्री आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोधनाची वाहने अडविल्यानंतर त्या जनावरांची रवानगी जिल्ह्यातील गोपालन केंद्रावर करण्यात येते. त्यामुळे काही काळ तस्करीमध्ये खंड पडतो. पण त्यानंतर पुन्हा तस्करी सुरू होऊन त्या निष्पाप जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी करण्यात येते.