शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका ...

तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका गावात गोधनाची तस्करी केली जात आहे. तेथून नागपूर व हैदराबाद येथे वाहनात डांबून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तस्करांचा दबदबा असल्याने त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होत असल्याने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोरोना संक्रमण काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराज्यीय गोधन तस्कारीच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातून गोधनाची चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यात वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील एका गावात तस्करीचा मोठा अड्डा झाला आहे.

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून बावनथडी नदी मार्गाने

गोधनाची वाहतूक तुमसर तालुक्यातील नदी काठावरील एका गावात करण्यात येते. तेथून ते गोधन नागपूर व हैदराबाद येथील कत्तलखान्यात जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक सर्रास सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.

यापूर्वी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व गोबरवाही येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातून येणारी जनावरांची वाहने अडवली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु कारवाईनंतर जनावरांच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.

तुमसर तालुक्यातील भूमिगत मॅग्ननीज खाण परिसरातील एका गावात मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती आहे. तस्करांचा दबदबा मोठा असल्यामुळे यांच्याविरोधात स्थानिक नागरिक पुढे येत नाहीत. संचारबंदी काळात जनावरांच्या तस्करीत मोठी वाढ झाली तरी प्रशासन याबाबत अनभिज्ञ दिसत आहे.

जनावरांची आंतरराज्य वाहतूक व कत्तलखान्याकडे रवानगी याचे कडक नियम अस्तित्वात असल्यावरही सर्रास गोधनाची कत्तलखान्याकडे रवानगी होत आहे. नियम केवळ कागदोपत्री आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोधनाची वाहने अडविल्यानंतर त्या जनावरांची रवानगी जिल्ह्यातील गोपालन केंद्रावर करण्यात येते. त्यामुळे काही काळ तस्करीमध्ये खंड पडतो. पण त्यानंतर पुन्हा तस्करी सुरू होऊन त्या निष्पाप जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी करण्यात येते.