शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जिल्ह्यातील शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

भंडारा : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाने उघाड दिल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतशिवारात मशागतीच्या ...

भंडारा : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाने उघाड दिल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतशिवारात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी नांगरणी, वखरणी तसेच धानाची नर्सरी टाकण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात आलेला महापूर व तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात अल्प उत्पादन आले होते. त्यामुळे यावर्षी नव्या उमेदीने शेतकरी खरिपाची तयारी करू लागले आहेत. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तसेच सोयाबीन, तूर पिकासाठी आधुनिक पद्धतीने लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. भंडारा तालुक्यातील चिखली येथे तानाजी गायधने यांच्या शेतावर रुंद सरी वरंभा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली. भंडारा तालुका कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणीचे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बांधावर खते पोहोचविण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. अनेक शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांना बियाणे, खते पोहोचविण्यात येत आहेत. संततधार पाऊस नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबासह आपल्या शेतात बांधबंदिस्ती, कचरा वेचणे, झुडपे तोडणे, वखरणीसारख्या कामात व्यस्त आहेत. एकीकडे पीक कर्जासाठी धावपळ तर दुसरीकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी बियाणे खते घरी आणून ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

बॉक्स

भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन पिकासोबतच भाजीपाला पिकांकडे कल वाढवला आहे. अनेक जण यावर्षी मिरची तसेच भाजीपाला पिकांकरिता मल्चिंग, ड्रीपची कामे करीत आहेत. भाजीपाला पिकासाठी ड्रिप, मल्चिंगचा वापर केल्यास पाण्यामध्ये बचत होते. सोबतच ताणाचे व्यवस्थापन करता येत असल्याने शेतकऱ्यांचा अधिक कल मल्चिंगवर भाजीपाला लागवड करण्याकडे कल आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून बी-बियाणे खते खरेदी करण्याचे काम सुरू आहे.

कोट

शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामध्ये खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी करू नये. आपल्या गावातील शेतकरी गटांमार्फत शेतकऱ्यांनी लागणाऱ्या खते, बियाण्याची मागणी गटांमार्फत केल्यास त्यांना बांधावर खते पोहोच या उपक्रमांतर्गत कृषी केद्रांकडून बियाणे पोहोचवले जाणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

-प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडारा