साकोलीत महागाईविरोधात सर्वपक्षीय धरणे
By Admin | Updated: June 28, 2014 23:25 IST2014-06-28T23:25:34+5:302014-06-28T23:25:34+5:30
केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर

साकोलीत महागाईविरोधात सर्वपक्षीय धरणे
रेल्वे दरवाढीचाही निषेध : सुकळी येथे आंदोलनाची परवानगी प्रशासनाने नाकारली
साकोली : केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर संघटनांच्यावतीने धरणे देण्यात आले.
भाजपच्या सरकारने महागाई कमी करण्याचे वचन देवून दिशाभूल केली. एका महिन्यात डिझेल, रॉकेल, रेल्वे भाडेवाढ, साखरेची किमती वाढवून अडचणीत आणले. संपुआ सरकारच्या काळात २०० ते २५० रूपये केंद्राच्या निर्धारित कृषी मुल्यात धानाच्या प्रति क्विंटलवर भाववाढ केली जात होती. परंतु नवीन सरकारने मात्र धानाला प्रति क्विंटल केवळ ५० रूपये वाढ देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
खते व बियाणावरील सबसीडी काढल्यामुळे खते व बियाणे महाग केली, डिझेल, रॉकेल, साखर व र ेरेल्वेच्या तिकीटामध्ये भाववाढ केली. या दरवाढीचा निषेध करीत भाववाढ सरकारने मागे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, मदन रामटेके, अश्विन नशीने, प्रदीप मासूरकर, प्रभाकर सपाटे, दिलीप मासूरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, विजय रामटेके, नरेश नागरीकर, विजू दुबे, ओम गायकवाड, भिवा वासनिक, तारा, जया भुरे, सविता शहारे, कौशल, शैलेश गजभिये यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)