शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यात सर्वदूर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:57 AM

चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरोवणीला वेग : वैनगंगेचा जलस्तर वाढला, गोसे धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे. सखल भागात पाणी शिरल्याने काही गावांमध्ये जाण्याचे रस्ते बंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.बुधवार रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. बुधवारी जिल्ह्यात सरासरी ११.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परंतु गुरुवारी काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. मात्र यामुळे किती घरांची पडझड अथवा कुठे नुकसान झाली याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. कारधा येथे वैनगंगा नदीची पातळी ६.३६ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. तर गोसेखुर्द धरणाची पातळी २४३.३६ मीटर आहे. सायंकाळी धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. भंडारा तालुक्यांतर्गत आतापर्यंत सहा मंडळांतर्गत ६७ टक्के पाऊस झाला आहे. यासह मोहाडीच्या सहा मंडळांतर्गत ६२, तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या पाच मंडळामध्ये ७२ टक्के, पवनी तालुक्यांतर्गत येणाºया सहा मंडळामध्ये १३३ टक्के, साकोली तालुक्यांतर्गत येणाºया तीन मंडळामध्ये ७८ टक्के, लाखांदुरात ८२ टक्के तर लाखनीच्या चार मंडळांतर्गत ६० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीतसंततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. चार दिवसांपूर्वी ओसरलेला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे खळखळून वाहू लागले आहेत. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही जाणवला. पाण्याची झळ सतत सुरु असल्याने अनेकांना घराबाहेर निघणेही मुश्कील झाले. दमदार पावसामुळे रोवणीच्या कामाला जोर आला असला तरी शिवारात चिखल करण्यासाठी बळीराजाला पावसाच्या उसंतची गरज आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र होते. पवनी, लाखांदूर, साकोली तालुक्यात अतिवृष्टीची माहिती आहे.

टॅग्स :Rainपाऊस