शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 07:30 IST

Bhandara News दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

ठळक मुद्देथेट मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

युवराज गोमासे

भंडारा : मुख्यमंत्री साहेब, शेतीतून उत्पन्न होत नाही. सतत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासन नुकसानभरपाई देत नाही. धानाला बोनसही मिळाला नाही. आर्थिक चटके सोसावे लागतात. अशा परिस्थितीत किराणा दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

जयगुनाथ गाढवे असे शेतकऱ्याचे नाव असून, त्यांची मोहाडी तालुक्यातील नीलज बुज येथे शेती आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा आपल्या पत्रातून त्यांनी मांडली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मोठे वादळ झाले. त्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली. परंतु शासनाने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. शासनाने गतवर्षीपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणे बंद केले. यामुळे प्रचंड आर्थिक चटके बसत आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे कसे, त्यांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठी दमछाक होत आहे. बाजार करायलाही खिशात पैसे नसतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्याला वाईन विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी गाढवे यांनी केली आहे. त्यांनी स्पीड पोस्टाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात गावात वादळ आले होते. अवकाळी पावसाने पीक नेस्तनाबूत केले. कुजलेल्या धानाच्या लोंबींना कोंब आले. १०० पोती धान होणाऱ्या माझ्या शेतात फक्त ४० पोती धान झाले. उदरनिर्वाह कसा चालवावा, हा प्रश्न आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाईन विक्रीची परवानगी द्या अशा मागणीचे पत्र पाठवले आहे.

-जयगुनाथ गाढवे, शेतकरी, नीलज बु., जि. भंडारा

टॅग्स :agricultureशेती