आठवडाभरानंतर करडी परिसरात बरसला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:50+5:30
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे.

आठवडाभरानंतर करडी परिसरात बरसला पाऊस
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविना पडीत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सुरु केलेली रोवणी रखडलेली आहेत. त्यातच आठ तास विजेच्या पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कोमेजलेल्या पराह्यना जीवनदान मिळाले. परंतु कडक उन्हाने तापलेल्या शेतीला रोवणीसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. उन सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला आहे. आता आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. परंतु अजूनही तापलेल्या शेतीची भूक शमलेली नाही. रोवणीसाठी पर्याप्त पाण्याचा साठा शेतात झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे.
विजेने वाढविली समस्या
जिल्ह्यात आठ तासाची वीज शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करणारी आहे. कडक उन्हात शेतीला सिंचन करण्याची क्षमता आठ तासाच्या विजेत नाही. त्यातच वारंवारच्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना फक्त सात तासाची वीज मिळत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतीचे बजेट बिघडले आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या समस्येने आणखी ग्रासले आहे.
कृषी सेवा केंद्रांचा काळाबाजार
मोहाडी तालुक्यात खत व कीटकनाशकांच्या काळाबाजाराला उधाण आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पहिल्या धाडीत करडी परिसरातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले होते. कृषी सेवा केंद्रानी शेतकºयांना अधिक भाव खत व कीटकनाशके विकणे, बिल न देणे आदी प्रमुख कारणांसह कारवाई केली होती. परंतु अजूनही ही समस्या सुटलेली नाही. शेतकºयांची पिळवणूक सुरुच आहे.