शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परतीच्या पावसाने बांध्यातच कडपा अंकुरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:42 IST

दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला.

ठळक मुद्देधान पडले काळे : शेतकºयांची दिवाळी अंधारात, बळीराजावर आर्थिक संकट, प्रशासनाचे दुर्लक्ष

मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला. धान पिकाची पूर्णत: नासाडी झाली असून बांध्यात असलेल्या धानाला आता अंकुर फुटले आहे. पावसामुळे धान काळे पडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निसर्ग शेतकºयांच्या पाचवीलाच पूजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीच्या प्रकाशमय, उत्साही वातावरणात धानाचा खरीप हंगाम वाया गेल्याने प्रत्येकांनी मन मोठे करून मुलाबाळांना समजावत दिवाळी अंधारातच पार पाडावी लागली. अंकुरलेल्या धानाला (कडपांना) मुल्य नसल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला. याला पिकविम्याचे कवच मिळेल काय? अशी विचारणा शेतकरी करीत आहे.खरीप हंगामात संपूर्ण खर्च आटोपून हातातोंडाशी आलेले पीक काळेकुट्ट झालेले पाहून शेतकºयांचे काळीज काळे पडले आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सर्वे होऊन सुमारे २५०-२८० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. प्रत्यक्षात हजारो हेक्टरचे नुकसान झालेले आहे. दिवाळीच्या दिवसात शेतकरी परिवारासोबत शेतातच कडप्यांना सुकविण्याचा व जमेल तेवढे डोक्यावरून घरी आणीत धान चुरण्याचा प्रयत्न करीत आहे.पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ४८ गावांचा नुकसान सर्वे सुरु असून पडलेले व कापलेले धानाची नुकसान क्षेत्र सुमारे २५० - २८० हेक्टर बाधीत दिसत आहे. ज्या ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे, त्यांनी कृषी कार्यालय बँक, महसूल, विमा कंपनी यांच्याशी तात्काळ संपर्क करून नुकसानीचा क्लेम फार्म भरून घ्यावा. क्लेम फार्म सोबत सातबारा, नुकसानग्रस्त शेताचे फोटो, आधार क्रमांकाच्या छायांकित प्रती जोडाव्या.-अरुण रामटेके, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी कार्यालय, पालांदूरनुकसानग्रस्त शेतकºयांनी पिकविमा उतरविला असल्यास त्यांनी ज्या बँकेतून, संस्थेतून पिककर्ज घेतले त्या बँकेत क्लेमफार्म, नुकसान फार्म, तक्रार फार्म भरून द्यावे. तशा सूचना आम्ही स्थानिक ठिकाणी पुरविल्या आहेत. ज्यांच्या तक्रारी रितसर प्राप्त होतील त्यांची कंपनीच्या वतीने तात्काळ चौकशी केली जाईल. नुकसानीची भरपाई नियमानुसार विचाराधीन राहील.-विनोद इंगळे, प्रबंधक ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, भंडारा.मागील हप्ताभरापासून पावसाच्या हजेरीने माझे दीड एकरातील सुपर फाईन (बारीक व्हेरायटी) धानाच्या कडपांना सडका वास व धान कडपातच अंकुरल्याने सुमारे १.२५ लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने पिकविम्याचे कवच देवून शेतकºयांना न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे.-बळीराम बागडे, प्रभावित शेतकरी, पालांदूर (चौ.)