शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने बांध्यातच कडपा अंकुरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:42 IST

दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला.

ठळक मुद्देधान पडले काळे : शेतकºयांची दिवाळी अंधारात, बळीराजावर आर्थिक संकट, प्रशासनाचे दुर्लक्ष

मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला. धान पिकाची पूर्णत: नासाडी झाली असून बांध्यात असलेल्या धानाला आता अंकुर फुटले आहे. पावसामुळे धान काळे पडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निसर्ग शेतकºयांच्या पाचवीलाच पूजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीच्या प्रकाशमय, उत्साही वातावरणात धानाचा खरीप हंगाम वाया गेल्याने प्रत्येकांनी मन मोठे करून मुलाबाळांना समजावत दिवाळी अंधारातच पार पाडावी लागली. अंकुरलेल्या धानाला (कडपांना) मुल्य नसल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला. याला पिकविम्याचे कवच मिळेल काय? अशी विचारणा शेतकरी करीत आहे.खरीप हंगामात संपूर्ण खर्च आटोपून हातातोंडाशी आलेले पीक काळेकुट्ट झालेले पाहून शेतकºयांचे काळीज काळे पडले आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सर्वे होऊन सुमारे २५०-२८० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. प्रत्यक्षात हजारो हेक्टरचे नुकसान झालेले आहे. दिवाळीच्या दिवसात शेतकरी परिवारासोबत शेतातच कडप्यांना सुकविण्याचा व जमेल तेवढे डोक्यावरून घरी आणीत धान चुरण्याचा प्रयत्न करीत आहे.पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ४८ गावांचा नुकसान सर्वे सुरु असून पडलेले व कापलेले धानाची नुकसान क्षेत्र सुमारे २५० - २८० हेक्टर बाधीत दिसत आहे. ज्या ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे, त्यांनी कृषी कार्यालय बँक, महसूल, विमा कंपनी यांच्याशी तात्काळ संपर्क करून नुकसानीचा क्लेम फार्म भरून घ्यावा. क्लेम फार्म सोबत सातबारा, नुकसानग्रस्त शेताचे फोटो, आधार क्रमांकाच्या छायांकित प्रती जोडाव्या.-अरुण रामटेके, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी कार्यालय, पालांदूरनुकसानग्रस्त शेतकºयांनी पिकविमा उतरविला असल्यास त्यांनी ज्या बँकेतून, संस्थेतून पिककर्ज घेतले त्या बँकेत क्लेमफार्म, नुकसान फार्म, तक्रार फार्म भरून द्यावे. तशा सूचना आम्ही स्थानिक ठिकाणी पुरविल्या आहेत. ज्यांच्या तक्रारी रितसर प्राप्त होतील त्यांची कंपनीच्या वतीने तात्काळ चौकशी केली जाईल. नुकसानीची भरपाई नियमानुसार विचाराधीन राहील.-विनोद इंगळे, प्रबंधक ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, भंडारा.मागील हप्ताभरापासून पावसाच्या हजेरीने माझे दीड एकरातील सुपर फाईन (बारीक व्हेरायटी) धानाच्या कडपांना सडका वास व धान कडपातच अंकुरल्याने सुमारे १.२५ लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने पिकविम्याचे कवच देवून शेतकºयांना न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे.-बळीराम बागडे, प्रभावित शेतकरी, पालांदूर (चौ.)