शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

महिनाभरानंतर मिरची, वांग्याचे भाव पुन्हा सावरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 5:00 AM

पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्‍टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे. 

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : ढगाळ वातावरणाचा परिणाम, चुलबंद नदीकाठावर पिकतो भाजीपाला

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा बाजारात नेण्याचा खर्चसुद्धा निघणे कठीण होता. परंतु गत आठ दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याची आवकवर  परिणाम झाल्याने व मागणी कायम असल्याने वांगे व मिरची च्या दरात बर्‍यापैकी भाव वाढ झालेली आहे.पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्‍टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे. पहिल्या टप्प्यातील धानाचा निधी आला असून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत धान मोजणी चा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे. यातून सुटका मिळावी व दररोज नगदी रुपये हातात यावे या दूरदृष्टीने चुलबंद खोऱ्यातील शेतकरी सुमार प्रगतीवर आहे. बागायती शेतीत वांगे ,मिरची यांचे दर बऱ्यापैकी सरसावलेले आहेत. शनिवारी आठवडी बाजारात वांगे चिल्लर भावात चाळीस रुपये किलोच्या दराने तर मिरची ४० ते ५० रुपये दराने विकल्या गेली. हा दर कायम राहिल्यास बागायतदारांना अधिक नफ्याची आशा देणारा ठरणार आहे.मिरची चा व्यापारी हा सुद्धा हायटेक झाला आहे. बीटीबी मुळे व्यापारी वर्गात खरेदी करता स्पर्धा तयार झाली असून यामुळे शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होत आहे. भाजीपाल्यात सुमार प्रगती साधली आहे. कृषी विभागाने पुरविलेल्या टिंबक व मल्चिंगचे अद्यावत ज्ञान व त्यात शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हेसुद्धा भाजीपाल्याच्या उत्पादनाकरिता प्रेरक ठरलेले आहेत. 

खोलमारा येथे भाजीपाला पिकांत वाढलाखांदूर तालुक्यातील चुलबंद काठावरील पालांदूर शेजारील खोलमारा या गावात प्रत्येक घरात भाजीपाल्याची शेती होत आहे. कारले व चवळी (शेंगा) यांचे उत्पादन अख्ख्या जिल्ह्यात परिचित आहेत. गावचे सरपंच अमृत मदनकर यांनी गावाला योग्य दिशा देत घराघरात प्रगतशील शेतकरी तयार केलेला आहे. पालांदूर येथे बारमाही भाजी उत्पादक देवराम तलमले, मोहन लांजेवार, धनपाल नदुरकर, प्रकाश नंदुरकर, रमाबाई लांजेवार, सुखदेव भुसारी, विश्वास राऊत, रीना राऊत, सतीश भुसारी, मनोहर भुसारी, धनश्याम लांजेवार, हेमराज भुसारी, अभिमान भुसारी, टिकाराम भुसारी, गजानन भुसारी, अरुण पडोळे, प्रशांत खागर आदी शेतकरी पालांदूरला ताजा भाजीपाला पुरवतात. यांच्या सेवेत पालांदूर येथील कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, गजानन हटवार, नरेंद्र खंडाईत व मंडळ कृषी कार्यालय नेहमी तत्पर असतात.

पांढरा वांगा उत्पादित असून त्याला प्रति किलोला ४० रुपयेचा प्रति किलो दर शनिवारी आठवडी बाजारात मिळालेला आहे. पांढरा वांगा ला खूप मोठी मागणी आहे. पांढरा वांगा ही पालांदूरची  भाजीपाल्याची जुनी ओळख आजही  कायम आहे. - सतिश भुसारी, बागायतदार पालांदुर.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी