अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:44 IST2016-08-05T00:44:44+5:302016-08-05T00:44:44+5:30
परिसरातील भंगार व्यवसाय करणाऱ्यांनी मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी ती भंगार ठेवल्यामुळे ग्रामस्थांना रहदारीला अडसर निर्माण झाला होता.

अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा
अड्याळ येथील प्रकरण भंगाराचे : पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई
अड्याळ : परिसरातील भंगार व्यवसाय करणाऱ्यांनी मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी ती भंगार ठेवल्यामुळे ग्रामस्थांना रहदारीला अडसर निर्माण झाला होता. आता ग्रामपंचायतीने हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे जाणवते. त्यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी मोकळा होणार आहे.
गेल्या सहा ते आठ वर्षापासून ज्या ग्रामस्थांनी ही कबाडी, हा व्यवसाय येथून हटविण्यात यावे, म्हणून कोर्टातही धाव घेतली होती. त्यानंतरही हा रस्ता अडवून धरल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होतच राहिला.
वृत्तपत्रात माहिती प्रकाशित होताच भंगार व्यवसाय करणारे रामदास दयाराम खोब्रागडे यांना ८ आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील जंगम मालमत्ता उचलण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ अन्वये संपूर्ण साहित्य पोलीस संरक्षणात उचल करून जप्त करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामपंचायतीने सदर व्यवसायिकाला दिल्याची माहिती आहे.अड्याळ ग्रामपंचायतीने कागदावर आक्रमक भूमिका निभावली असली तरी त्याची अंमलबजावणी खरच होणार यात ही ग्रामस्थांना शंका असल्याची चर्चा आहे. कारण या आधी सुद्धा असे घडले. त्यामुळे शंका असल्याचे बोलले जात असले तरी यावेळी असे होणार नसल्याचेही ग्रामपंचायत कडून बोलल्या जात आहे.
माहितीप्रमाणे वॉर्ड क्र. ३ येथील सार्वजनिक रस्त्यावर जलनिसारण गटारेवर व खुल्या जागेवर कबाडीचे निरूपयोगी साहित्य जंगम मालमत्ता ठेवले जाते त्यामुळे वाहतुकीस व येणाऱ्या जाणाऱ्यास त्यामुळे अडथळा ही होतो.
निरूपयोगी साहित्य रस्त्यावर व नालीवर ठेवल्यामुळे पावसाचे पाणी साहित्यात साचल्यामुळे रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे व्यवसायीकाने तात्काळ सात आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील व खुल्या जागेवरील निरूपयोगी साहित्य व जंगम मालमत्ता उचल करावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ चाही उल्लेख करून खोब्रागडे यांना ग्रामपंचायतीने लेखी पत्रही पाठविले आहे.
सहा ते आठ वर्षांपासून जे सहजासहजी हटले नाही ते एका ग्रामपंचायतीच्या अधिनियमाला पेलणार का,? असा प्रश्न उपस्थित होतो. याकडे अड्याळवासियांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या कारवाहीकडे लागून आहे. (वार्ताहर)