शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वंधत्व निवारणासाठी पाच गावे दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचा पुढाकार : तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुग्ध उद्योगात मोठ्या आर्थिक हानीचे कारण गुरांमधील वंधत्व आहे. वांझ प्राण्यांना पोसणे एक आर्थिक ओझे असते. या गुरांच्या वंधत्व निवारणासाठी पशुसंवर्धन विभाग, राजस्थान जयपूर येथील शिवम ड्रग्स यांनी कंबर कसली आहे. भंडारा जिल्ह्यातील पाच गावातील वंधत्व असलेली २५० गुरे दत्तक घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या पाच गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे.या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे. चमूच्या सहकार्यासाठी भंडारा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सतीश राजू यांच्यासह डॉ.ए.डी. जुमळे, डॉ.बी.के. बारापात्रे, डॉ.येमपुरे, डॉ.एम.के. बारापात्रे आदी अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत आहेत.दत्तक घेतलेल्या पाच गावांचा दौरा डॉ.बी. भारद्वाज यांनी केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वंधत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतातील ७० टक्के नागरिक पशूपालनावर उदरनिर्वाह करीत आहेत. देशामध्ये दुग्ध उत्पादनातून गोपालकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचा वाटा आहे. गायी आणि म्हशीचे लैंगिक चक्र १८ ते २१ दिवसातून एकदा १८ ते २४ तासांसाठी असते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतकऱ्यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्रीपर्यंत चार पाचदा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णता गेल्यामुळे वंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणाºया प्राण्यांमध्ये दृष्य, चिन्हे ओळखण्यासाठी बऱ्यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात. वंधत्वाची अनेक कारणे असू शकतात. वंधत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतू संसर्ग, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकामध्ये असमतोलची कारणे असू शकतात.आर्थिक उन्नतीसाठी दुग्धोत्पादन गरजेचेभारतात ३० कोटी गावातील पशू १३ ते १४ कोटी बछडे पैदास करू शकतात. भारतात मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. ही जनावरे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मोकाट जनावरांची देखभाल करून त्यांचे वंधत्व निवारण केल्यास दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. जनावरांची योग्य निगा व काळजी घेतल्यास शेतकºयांचे जीवनमान उंचावू शकते. दत्तक घेतलेल्या पाच गावांतील जनावरांचे एकाच वेळी सर्व्हे करण्यात येणार आहे. वंधत्व असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना गाभण राहण्यासाठी असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्यासह पशूसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाला योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर सदर उपक्रम जिल्हाभर राबविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस आहे.

टॅग्स :Socialसामाजिक