शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वंधत्व निवारणासाठी पाच गावे दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचा पुढाकार : तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुग्ध उद्योगात मोठ्या आर्थिक हानीचे कारण गुरांमधील वंधत्व आहे. वांझ प्राण्यांना पोसणे एक आर्थिक ओझे असते. या गुरांच्या वंधत्व निवारणासाठी पशुसंवर्धन विभाग, राजस्थान जयपूर येथील शिवम ड्रग्स यांनी कंबर कसली आहे. भंडारा जिल्ह्यातील पाच गावातील वंधत्व असलेली २५० गुरे दत्तक घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या पाच गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे.या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे. चमूच्या सहकार्यासाठी भंडारा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सतीश राजू यांच्यासह डॉ.ए.डी. जुमळे, डॉ.बी.के. बारापात्रे, डॉ.येमपुरे, डॉ.एम.के. बारापात्रे आदी अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत आहेत.दत्तक घेतलेल्या पाच गावांचा दौरा डॉ.बी. भारद्वाज यांनी केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वंधत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतातील ७० टक्के नागरिक पशूपालनावर उदरनिर्वाह करीत आहेत. देशामध्ये दुग्ध उत्पादनातून गोपालकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचा वाटा आहे. गायी आणि म्हशीचे लैंगिक चक्र १८ ते २१ दिवसातून एकदा १८ ते २४ तासांसाठी असते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतकऱ्यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्रीपर्यंत चार पाचदा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णता गेल्यामुळे वंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणाºया प्राण्यांमध्ये दृष्य, चिन्हे ओळखण्यासाठी बऱ्यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात. वंधत्वाची अनेक कारणे असू शकतात. वंधत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतू संसर्ग, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकामध्ये असमतोलची कारणे असू शकतात.आर्थिक उन्नतीसाठी दुग्धोत्पादन गरजेचेभारतात ३० कोटी गावातील पशू १३ ते १४ कोटी बछडे पैदास करू शकतात. भारतात मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. ही जनावरे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मोकाट जनावरांची देखभाल करून त्यांचे वंधत्व निवारण केल्यास दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. जनावरांची योग्य निगा व काळजी घेतल्यास शेतकºयांचे जीवनमान उंचावू शकते. दत्तक घेतलेल्या पाच गावांतील जनावरांचे एकाच वेळी सर्व्हे करण्यात येणार आहे. वंधत्व असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना गाभण राहण्यासाठी असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्यासह पशूसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाला योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर सदर उपक्रम जिल्हाभर राबविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस आहे.

टॅग्स :Socialसामाजिक